एनडीए की इंडिया? यूपीतील समीकरणं बदलण्याची ताकद असलेल्या मायावतींनी पत्ते खोलले!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  एनडीए की इंडिया? यूपीतील समीकरणं बदलण्याची ताकद असलेल्या मायावतींनी पत्ते खोलले!

एनडीए की इंडिया? यूपीतील समीकरणं बदलण्याची ताकद असलेल्या मायावतींनी पत्ते खोलले!

Updated Aug 30, 2023 03:44 PM IST

Mayawati On INDIA Alliance: इंडिया आघाडीच्या बैठकीच्या एक दिवस आधी मयावतींनी मोठी घोषणा केली आहे.

Mayawati
Mayawati (PTI)

Mayawati News: बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती या भाजपविरोधी इंडिया आघाडीमध्ये सामील होणार की नाही? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र, इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीच्या एक दिवसपूर्वी मायावती यांनी मोठी घोषणा केली.  इंडिया आघाडीमध्ये सामील होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातील सर्व प्रमुख पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी अनेक पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. मायावतींच्या नेतृत्त्वाखालील बहुजन समाज पक्ष इंडिया आघाडीत सामील होणार असल्याची अटकळ बांधली जात होती. मायावतींनी अशा चर्चांना पूर्णविराम लावला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्याचे मायावतींनी स्पष्ट केले. तसेच एनडीए आणि इंडिया देशातील दोन्ही आघाडी गरीबविरोधी आणि जातिवादी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

मायावती यांनी आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, “एनडीए आणि इंडिया या दोन्हीही आघाडी गरीबविरोधी, जातीयवादी आणि भांडवलशाही धोरणांवर चालणारे पक्ष आहेत. अशा धोरणांविरोधात बसपाने सातत्याने आवाज उठवला आहे. यामुळे त्यांच्याशी हात मिळवणी करून निवडणूक लढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बसपा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणार आहे. माझी माध्यमांना विनंती आहे की, त्यांनी खोट्या बातम्या पसरवू नयेत.”

पुढे मायावती म्हणाल्या की, "बसपाशी युती करण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. परंतु,आमचा स्पष्ट नकार आहे. यामुळे आम्ही भाजपशी मिलीभगत केली असल्याचा आरोप केला जातोय. इंडिया आघाडीशी युती करणारे धर्मनिरपेक्ष आहेत आणि युती न करणारे भाजप. द्रांक्षे खायला नाही मिळाली की, ते आंबट आहेत, अशा म्हणीप्रमाणे. हे चुकीचे आहे.

“बसपातून हकालपट्टी झाल्यानंतर सहारनपूरचे माजी आमदार काँग्रेस आणि त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांची स्तुती करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांनी आधी हा पक्ष का सोडला आणि मग दुसऱ्या पक्षात सामील का झाले? असा प्रश्न लोकांना पडणे स्वाभाविक आहे. अशा लोकांवर विश्वास कसा ठेवायचा? असाही प्रश्न मायावती यांनी उपस्थित केला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर