भारतात मुस्लिमांवर अत्याचार; इराणच्या सर्वोच्च नेत्याचा द्वेषपूर्ण संदेश, इस्लामी ऐक्याचे आवाहन
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  भारतात मुस्लिमांवर अत्याचार; इराणच्या सर्वोच्च नेत्याचा द्वेषपूर्ण संदेश, इस्लामी ऐक्याचे आवाहन

भारतात मुस्लिमांवर अत्याचार; इराणच्या सर्वोच्च नेत्याचा द्वेषपूर्ण संदेश, इस्लामी ऐक्याचे आवाहन

Sep 16, 2024 09:01 PM IST

इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांनी ट्विटरवर लिहिले की, "म्यानमार, गाझा, भारत किंवा इतर कोणत्याही ठिकाणी एखाद्या मुस्लिमाच्या दु:खाबद्दल आपण अनभिज्ञ असू तर आपण स्वतःला मुस्लिम समजू नये.

इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी
इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी (via REUTERS)

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई म्हणाले की, भारतात मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत. पैगंबर मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी सोमवारी हे वक्तव्य केले आणि जगभरातील मुस्लिमांमध्ये एकजूट करण्याचे आवाहन केले. म्यानमार, गाझा, भारत किंवा इतर कोणत्याही ठिकाणी कोणत्याही मुस्लिमाच्या दु:खाबद्दल आपण अनभिज्ञ असू, तर आपण स्वत:ला मुसलमान समजू नये. त्यांनी भारतातील मुस्लीम अल्पसंख्याकांचा उल्लेख का केला, याचा तपशील त्यांनी दिला नाही. याबाबत भारतीय अधिकाऱ्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

इस्लामच्या शत्रूंनी नेहमीच इस्लामी उम्मा (समुदाय किंवा राष्ट्र) म्हणून आमची सामायिक ओळख कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आहे, असे खामेनी म्हणाले. एक्सवरील एका वेगळ्या पोस्टमध्ये त्यांनी पुन्हा गाझा आणि पॅलेस्टाईनमधील शोषित लोकांचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, त्यात भारताचा उल्लेख नव्हता. इस्लामी उम्माचा सन्मान राखण्याचे उद्दिष्ट केवळ एकतेच्या माध्यमातूनच साध्य होऊ शकते, असे ते म्हणाले. आज गाझा आणि पॅलेस्टाईनमधील छळ झालेल्या लोकांना पाठिंबा देणे हे आपले कर्तव्य आहे. जो कोणी त्यापासून दूर जाईल, नक्कीच अल्लाह त्याची चौकशी करेल. 

भारत आणि इराणचे संबंध कसे आहेत ?

तसे पाहिले तर भारत-इराणमधील संबंध मजबूत आहेत. द्विपक्षीय संबंधांमध्ये कोणताही मोठा अडथळा आलेला नाही. चाबहार करारात भारत महत्त्वाचा भाग आहे. मे २०१५ मध्ये नवी दिल्लीने चाबहार बंदराच्या विकासासाठी सामंजस्य करार केला. मे २०१६ मध्ये भारत, इराण आणि अफगाणिस्तान यांनी आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी केली, ज्याला चाबहार करार देखील म्हणतात. इराणचे माजी राष्ट्रपती इब्राहिम रईसी आणि माजी परराष्ट्रमंत्री हुसेन अमीर-अब्दुल्लाहियान यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करण्यासाठी उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ मे महिन्यात अधिकृत समारंभात सहभागी होण्यासाठी गेले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती.

इराणच्या सर्वोच्च नेत्याने याआधीही केले आहे असे वक्तव्य -

इराणच्या सर्वोच्च नेत्याने भारतातील मुस्लिमांबाबत वक्तव्य  करण्याची ही पहिलीच वेळ नाही २०१९ मध्ये जेव्हा जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आलं तेव्हा त्यांनी काश्मीरमधील मुस्लिमांच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमध्ये उचललेल्या या पावलामुळे मुस्लिमांमध्ये भीती निर्माण झाली आहे. काश्मीरमधील मुस्लिमांची स्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही चिंतेत होतो. भारताशी आमचे चांगले संबंध आहेत, पण भारत सरकारने काश्मीरमधील लोकांबाबत न्याय्य धोरण स्वीकारावे, अशी आमची अपेक्षा आहे. तसेच यामुळे या भागातील मुस्लिमांचा छळ थांबेल. भारत-पाकिस्तान वादासाठी त्यांनी ब्रिटनला जबाबदार धरले. काश्मीरमधील संघर्ष कायम ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक अशा अनेक गोष्टी त्या भागात केल्या, ज्यामुळे आजही दोन्ही देश त्रस्त आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर