Indian Railways: अर्थसंकल्प सादर होताच रेल्वेमंत्र्यांनी ‘वंदे भारत’ बाबत दिली मोठी अपडेट, वाचून तुम्हालाही होईल आनंद!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Indian Railways: अर्थसंकल्प सादर होताच रेल्वेमंत्र्यांनी ‘वंदे भारत’ बाबत दिली मोठी अपडेट, वाचून तुम्हालाही होईल आनंद!

Indian Railways: अर्थसंकल्प सादर होताच रेल्वेमंत्र्यांनी ‘वंदे भारत’ बाबत दिली मोठी अपडेट, वाचून तुम्हालाही होईल आनंद!

Feb 01, 2025 10:16 PM IST

RailwaysBudget : पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी २.५२ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून १७,५०० जनरल कोच, २०० वंदे भारत आणि १०० अमृत भारत गाड्या बनविण्यासारख्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी दिली.

अर्थसंकल्पात रेल्वेसाठी भरीव तरतूद
अर्थसंकल्पात रेल्वेसाठी भरीव तरतूद

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये पुढील आर्थिक वर्षासाठी रेल्वेसाठी २.५२ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत ट्रेनबाबत असे अपडेट दिले, ज्यामुळे लाखो प्रवाशांना आनंद होईल. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अर्थसंकल्पात २०० वंदे भारत गाड्या बनवण्याच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आल्याचे सांगितले आहे.

पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी २.५२ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून १७,५०० जनरल कोच, २०० वंदे भारत आणि १०० अमृत भारत गाड्या बनविण्यासारख्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी दिली. २०२५-२६ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर रेल्वे भवनात पत्रकारांशी बोलताना वैष्णव यांनी रेल्वेसाठी वाटप करण्यात आलेले प्रकल्प आणि भविष्यातील खर्चाची माहिती दिली.

२०० नव्या वंदे भारतची निर्मिती -

अर्थसंकल्पात ४.६ लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा समावेश असून येत्या चार ते पाच वर्षांत ते पूर्ण होतील. यामध्ये नवीन रेल्वे मार्ग टाकणे, विद्यमान रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण, नवीन रेल्वे मार्गबांधणी, स्थानकांचा पुनर्विकास आणि उड्डाणपूल आणि अंडरपास सारख्या कामांचा समावेश आहे. रेल्वे प्रवासाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी येत्या दोन-तीन वर्षांत १०० अमृत भारत, ५० नमो भारत आणि २०० वंदे भारत गाड्यांची निर्मिती करण्यात येणार आहे.

नव्या अमृत भारत ट्रेनमुळे आम्ही इतर अनेक कमी पल्ल्याच्या शहरांना जोडणार आहोत. रेल्वेगाड्यांमध्ये जनरल क्लासच्या डब्यांच्या तुटवड्याबाबत विचारले असता वैष्णव म्हणाले की, येत्या काही वर्षांत असे १७,५०० डबे तयार केले जातील.

जगातील दुसरी मोठी मालवाहू कंपनी बनणार रेल्वे -

जनरल क्लासच्या डब्यांची निर्मिती सुरू असून ३१ मार्चअखेर पर्यंत असे १४०० डबे तयार होतील, असे वैष्णव यांनी सांगितले. पुढील आर्थिक वर्षात दोन हजार जनरल डबे तयार करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर एक हजार नवीन उड्डाणपुलांच्या बांधकामालाही मंजुरी देण्यात आली आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत रेल्वे मालवाहू वहन क्षमतेच्या बाबतीत मोठा टप्पा गाठणार आहे. ३१ मार्चपर्यंत १.६ अब्ज टन मालवाहतुकीचे उद्दिष्ट गाठू आणि भारतीय रेल्वे चीननंतर जगातील दुसरी सर्वात मोठी मालवाहू विमानवाहतूक कंपनी बनेल, असे ते म्हणाले.

 

येत्या वर्षात १०० टक्के विद्युतीकरण-

ते म्हणाले की, चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस भारतीय रेल्वे १०० टक्के विद्युतीकरण साध्य करणार आहे. रेल्वे वाहतुकीच्या सुरक्षिततेवर भर देताना वैष्णव म्हणाले की, सरकारने यासाठी ची तरतूद १.०८ लाख कोटी रुपयांवरून १.१४ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढविली आहे आणि पुढील आर्थिक वर्षात ती वाढवून १.१६ लाख कोटी रुपये केली जाईल. सार्वजनिक-खासगी भागीदारीअंतर्गत (पीपीपी) गुंतवणुकीची ही जोड दिल्यास एकूण बजेट २.६४ लाख कोटी रुपये होते, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर