पहलगामयेथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे सरकार आणि लष्कर भीतीच्या सावटाखाली जगत आहे. त्यांना भारताच्या प्रत्युत्तराची भीती वाटते. त्यामुळेच पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमधील सर्व धार्मिक कार्यक्रम पुढील १० दिवसांसाठी बंद केले आहेत. इतकंच नाही तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेले १००० हून अधिक मदरसे ही तात्पुरते बंद केले आहेत. भारत या मदरशांना दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे म्हणून टार्गेट करू शकतो, अशी भीती खुद्द पाकिस्तानी अधिकारीच व्यक्त करतात.
त्याचबरोबर LOC पासून कित्येक किमी दूर असलेल्या पाकच्या खैबर पख्तूनख्वा भागात सरकारने २९ जिल्ह्यात सायरन प्रणाली लावण्याचे आदेश दिलेत. ज्यात पेशावर, एबटाबाद यांचाही समावेश आहे.
पाकिस्तानी अधिकारी हाफिज नजीर अहमद यांनी रॉयटर्सला सांगितले की, "हे मदरसे तात्पुरते बंद करणे हा आमचा बचावात्मक उपाय आहे. मात्र, उष्णतेची लाट लक्षात घेऊन अशी पावले उचलण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानला सध्या दोन प्रकारच्या उष्णतेचा सामना करावा लागत आहे. एक हंगामी आहे. दुसरे कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोषामुळे निर्माण झाले आहे. पाकिस्तानात अराजकाची शक्यता लक्षात घेऊन अधिसूचनेत उष्णतेची लाट असल्याचे त्यांनी स्वत: स्पष्ट केले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये ४४५ नोंदणीकृत मदरसे असून त्यात २६ हजारांहून अधिक विद्यार्थी आहेत.
पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी लाँच पॅड आणि ट्रेनिंग कॅम्पवर भारत बऱ्याच काळापासून बारीक नजर ठेवून आहे. अनेक अहवाल आणि गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार हे मदरसे जिहादी प्रशिक्षण कारवायांमध्ये सामील असल्याचे समोर आले आहे. 2016 चा सर्जिकल स्ट्राईक आणि 2019 च्या बालाकोट एअर स्ट्राईकनंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये पहिल्यांदाच अशी खळबळ पाहायला मिळत आहे.
संबंधित बातम्या