VIDEO : मी कसं जगणार? पत्नीची आक्रोश, पहलगाममध्ये हनीमून साजरा करत असताना नौदल अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  VIDEO : मी कसं जगणार? पत्नीची आक्रोश, पहलगाममध्ये हनीमून साजरा करत असताना नौदल अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या

VIDEO : मी कसं जगणार? पत्नीची आक्रोश, पहलगाममध्ये हनीमून साजरा करत असताना नौदल अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या

HT Marathi Desk HT Marathi
Published Apr 23, 2025 06:07 PM IST

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम जिल्ह्यात पत्नीसोबत हनीमून एन्जॉय करत असताना दहशतवाद्यांनी लेफ्टनंट विनय नरवाल (२६) यांची गोळ्या झाडून हत्या केली.

विनय नरवाल यांच्या पत्नीचा विलाप
विनय नरवाल यांच्या पत्नीचा विलाप

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल यांना त्यांची पत्नी हिमांशी यांनी हृदयस्पर्शी आणि अश्रूपूर्ण निरोप दिला आहे. नरवाल यांचे पार्थिव दिल्लीत आणले असता इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांच्या पार्थिवाला चिकटून त्यांची पत्नी रडली. या दरम्यान ती म्हणत राहिली, "मी कसं जगणार? सात दिवसांपूर्वी १६ एप्रिल रोजी दोघांचा विवाह झाला होता. त्याच्या हाताची मेंहदी अजून कोरडीही झाली नव्हती, इतक्यात त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. एअर चीफ मार्शल आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीही नरवाल यांना श्रद्धांजली वाहिली.

करनालचा रहिवासी होते नरवाल -

विनय नरवाल (वय २६) हे पत्नीसोबत पहलगाम येथे सुट्टीवर गेले असताना दहशतवाद्यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. ते हरियाणातील करनाल जिल्ह्यातील भुसली गावचा रहिवासी होते. त्यांचे कुटुंब कर्नाल शहरात राहते. या दोघांचे सात दिवसांपूर्वी लग्न झाले होते. त्यांच्या एका नातेवाईकाने सांगितले की, लग्नानंतर सर्वजण जल्लोष करत होते आणि आनंदी होते, परंतु अचानक ही दु:खद बातमी आली.

आणखी एक शेजारी सीमा म्हणाली की, दिवंगत अधिकाऱ्याच्या घरी हा भव्य सोहळा पार पडला आणि लग्नानंतर केवळ नरवाल कुटुंबीयच नव्हे तर संपूर्ण परिसर आनंदात होता. नरवाल यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली आणि नंतर ते भारतीय नौदलात अधिकारी झाले. नवदाम्पत्य स्वित्झर्लंडमध्ये हनीमून प्लॅन करत होते, पण सुट्टीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काश्मीरला जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्या कुटुंबावर काय परिणाम होत आहेत याची आपण कल्पनाही करू शकत नाही. "

हल्ल्याची वेळ खूप महत्वाची -

मंगळवारी (२२ एप्रिल) पहलगाममध्ये लष्कराचा गणवेश परिधान केलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून हिंदू असल्याचे समजताच त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास २० जण जखमी झाले आहेत. या भ्याड हल्ल्याचा जगभरात निषेध केला जात आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असताना आणि दुसरीकडे अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हॅन्स आणि त्यांचे कुटुंबीय भारत दौऱ्यावर आले असताना हा हल्ला झाला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर