हरयाणातील भाजपच्या विजयानंतर भडकले राकेश ​टिकैत; म्हणाले, खड्ड्यात जाईल देश!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  हरयाणातील भाजपच्या विजयानंतर भडकले राकेश ​टिकैत; म्हणाले, खड्ड्यात जाईल देश!

हरयाणातील भाजपच्या विजयानंतर भडकले राकेश ​टिकैत; म्हणाले, खड्ड्यात जाईल देश!

Updated Oct 09, 2024 12:08 AM IST

rakeshtikaiton haryana Result : राकेश टिकैत म्हणाले की, हरियाणाची जनता भाजपवर इतकी नाराज होती, मात्र तरीही त्यांचे सरकार येत आहे. हे कसे होत आहे, काहीच समजत नाही.

राकेश ​टिकैत
राकेश ​टिकैत

हरयाणा विधानसभा निवडणुकीत विजय मिळत भाजप सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन होत आहे. यावर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राकेश टिकैत म्हणाले की, आता देश आणखी खड्ड्यांमध्ये जाईल. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनीही राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होईल, अशी आशा व्यक्त केली होती. टिकैत यांनी उघडपणे काँग्रेससाठी मते मागितली नसली तरी ते काँग्रेसला पाठिंबा देत होते. त्यामुळेच हरयाणात भाजपने बहुमत मिळवताच राकेश टिकैत संतापले आहेत.

टिकैत म्हणाले की, भाजपविरोधात एवढी नाराजी असतानाही भाजप जिंकला तर देश पूर्णपणे विकला जाईल, देश खड्ड्यात जाईल. टिकैत म्हणाले की, हरियाणाची जनता भाजपवर इतकी नाराज होती,तरीही सरकार स्थापन केले जात आहे. हे कसे होत आहे हेच आम्हाला समजत नाही. जनतेने भाजपला संधी दिली आहे, असे वाटत नाही, त्यात नक्कीच काही घोटाळा आहे. केंद्र सरकारला सत्ता स्थापनेचे सर्व मार्ग माहित आहेत. 

जनतेला कसे तोडायचे आणि सरकार कसे स्थापन करायचे हे या सरकारला चांगलेच ठाऊक आहे. राकेश टिकैत यांनी निवडणूक आयोग आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही प्रश्न उपस्थित केले.  त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर निःपक्षपातीपणे लक्ष ठेवावे, असे टिकैत म्हणाले. सरकारकडे निवडणुका जिंकण्याचे अनेक मार्ग आहेत आणि ते या पद्धतींचा वापर करून निवडणुकीत हेराफेरी करू शकतात, असा आरोप त्यांनी केला.

राकेश टिकैत यांनी भाजपच्या पराभवाची केली होती भविष्यवाणी -

राकेश टिकैत म्हणाले की, निवडणूक निकालापूर्वी त्यांनी भाजपच्या पराभवाचे भाकीत केले होते. टिकैत म्हणाले होते की, हरयाणा निवडणुकीत सरकारचे मोठे नुकसान होणार आहे. आता हरयाणात भाजपचे सरकार स्थापन होणार नाही. हरयाणाच्या जनतेत भाजप सरकारविरोधात राग आहे.  टिकैत यांनी हरयाणात भाजपच्या पराभवामागे शेतकरी आंदोलन कारणीभूत असल्याचे सांगितले होते. शेतकरी आंदोलन दिल्लीत झाले असले तरी त्याचा सर्वाधिक परिणाम हरयाणात झाला, असे शेतकरी नेते म्हणाले होते. त्याचा प्रभाव हरयाणाच्या निवडणुकीत दिसू शकतो.

हरियाणाच्या मतदारांनी शेतकऱ्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष केले -

 पंजाब भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा जयिंदर कौर म्हणाल्या की, पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले, पण व्होट बँकेत १८ टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती. हरयाणात विधानसभा निवडणुकीच्या वेळी शेतकरी संघटनांचा प्रचंड विरोध दिसून आला, मात्र हरयाणातील मतदारांनी शेतकऱ्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून त्यांच्या सोनेरी भवितव्याला प्राधान्य देत भाजपला सलग तिसरी संधी दिली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर