धक्कादायक! लग्नाला नकार दिला म्हणून विवाहित महिलेची गोळ्या झाडून हत्या, आरोपी अटकेत
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  धक्कादायक! लग्नाला नकार दिला म्हणून विवाहित महिलेची गोळ्या झाडून हत्या, आरोपी अटकेत

धक्कादायक! लग्नाला नकार दिला म्हणून विवाहित महिलेची गोळ्या झाडून हत्या, आरोपी अटकेत

Ashwjeet Jagtap HT Marathi
Published Feb 09, 2025 10:43 AM IST

Gurugram Man Shoots Woman: गुरुग्राममध्ये लग्नाला नकार दिला म्हणून महिलेची हत्या करण्यात आली. मृत महिला विवाहित असतानाही आरोपी तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव आणत होता. यातूनच आरोपीने तिच्यावर गोळ्या झाडळ्या.

लग्नाला नकार दिला म्हणून विवाहित महिलेची गोळ्या झाडून हत्या
लग्नाला नकार दिला म्हणून विवाहित महिलेची गोळ्या झाडून हत्या (file photo)

Gurugram Murder News: गुरुग्राममध्ये लग्नाला नकार दिला म्हणून एका तरुणाने विवाहित महिलेवर गोळ्या झाडल्या. या घटनेत संबंधित महिला गंभीर जखमी झाली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

उपेंद्र कुमार (वय २३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो उत्तर प्रदेशच्या औरेया जिल्ह्यातील किशनपूर येथील रहिवाशी आहे. गुरुग्राम सेक्टर-१० ए पोलीस स्टेशनला शुक्रवारी रात्री सेक्टर- ३७ मधील घर क्रमांक-५५३ समोर महिलेवर गोळ्या झाडल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलीस ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत महिलेला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. गंभीर अवस्थेत महिलेला दिल्लीतील एका रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

मृत महिलेच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या मुलीचे लग्न उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील किशनपूर गावातील एका तरुणाशी झाले. आरोपी आणि मयत एका शिकवणी केंद्रात शिक्षिका होत्या. तिच्या पतीला त्यांच्या मैत्रीचा संशय आला आणि त्यांचे वाद वाढत गेल्याने ती दोन वर्षांपूर्वी तिच्या वडिल आणि मुलीसह गुरुग्रामला गेली. ती येथील एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होती. शुक्रवारी आरोपी उपेंद्र तिला भेटायला गेला आणि त्याने कंपनीजवळील सेक्टर-३७ मध्ये त्याच्यावर गोळीबार केला आणि तो पसार झाला.

पोलिस प्रभारी रामबीर सिंह यांनी सांगितले की, आरोपीच्या पोलीस चौकशीत पीडितेचे लग्न आरोपीच्या गावातील एका व्यक्तीशी झाले होते. मयत आणि आरोपी दोघेही ट्यूशन शिकवायचे, या दरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली आणि ते एकमेकांशी बोलू लागले. दोघांच्या मैत्रीमुळे महिला आणि तिच्या पतीमध्ये भांडण झाले होते. महिलेने आरोपीचा नंबर ब्लॉक केला. हीच वैमनस्य कायम ठेवत त्याच्यावर गोळ्या झाडून प्राणघातक हल्ला करण्यात आला.

किशनपूरमधील लोक या घटनेने हैराण झाले आहेत. लोकांचे म्हणणे आहे की, उपेंद्रने यापूर्वीच एका तरुणीचा विनयभंग केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली होती. आरोपीचे वडील चतुर सिंग म्हणाले की, त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. आठवडाभरापूर्वी उपेंद्र गावातून गुरुग्रामला गेला होता. आई-वडिलांचा तो एकुलता एक मुलगा आहे. आरोपीला एक लहान बहीणही आहे. वडील चतुर सिंग प्लंबरचे काम करतात.

Ashwjeet Jagtap

TwittereMail

अश्वजीत जगताप हिंदुस्तान टाइम्स मराठीमध्ये सीनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहे. अश्लजीत येथे राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स, टेक्नोलॉजी, ऑटो, व्हायरल न्यूज आणि करिअर संबंधित बातम्या लिहितो. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात एकूण ५ वर्षांचा अनुभव आहे. यापूर्वी लेटेस्टली- मराठी (डिजिटल), एबीपी माझा (डिजिटल) मध्ये कामाचा अनुभव. अश्वजीतला क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळणे आणि बायोपिक चित्रपट पाहायला आवडतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर