Pakistan Girl Poisoned 13 Family Members: शेजारी पाकिस्तानातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्या प्रियकराशी लग्न करण्यास घरच्यांनी नकार दिल्याने संतापाच्या भरात तरुणीने जेवणात विष मिसळून आपल्याह कुटुंबियांतील १३ जणांची हत्या केल्याचं उघड झालं आहे. ही घटना पाकिस्तानच्या सिंध प्रांतात घडली आहे. या प्रकरणी सिंध पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली असून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाकिस्तानातील सिंध मधून पोलिसांनी रविवारी एका मुलीला अटक केली. या मुलीने जेवणात विष मिसळून कुटुंबातील १३ जणांची हत्या केली. मुलीचे कुटुंबीय तिच्या मर्जीनुसार तिच्या प्रियकराशी तिचे लग्न लावून देण्यास तयार नव्हते. खैरपूरजवळील हैबत खान ब्रोही गावात १९ ऑगस्ट रोजी एकाच घरातील १३ जणांचा मृत्यू झाला होता. आरोपीमुलीने तिच्या प्रियकरासोबत मिळून आई-वडिलांसह कुटुंबातील सर्व सदस्यांना विष पाजल्याचे तपासात उघड झालं आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकारी इनायत शहा यांनी सांगितले की, तरुणीने तिच्या प्रियकरासोबत मिळून हा कट रचला. तिने सर्वांच्या जेवणात विष मिसळले. घरातील सर्व जण जेवल्यानंतर त्यांना अचानक त्रास होऊ लागला. दरम्यान, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांच्या मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता. शवविच्छेदन अहवालात १३ जणांचा मृत्यू हा विषारी अन्न खाल्ल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. यावेळी मुलगी आणि तिच्या प्रियकराने घरात ब्रेड बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गव्हात विष मिसळल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी रविवारी दोघांनाही अटक केली.
१९ ऑगस्ट रोजी घरात सर्वांनी जेवण केले. यानंतर तब्बल नऊ जणांचा मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या दिवशी रुग्णालयात उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. या घटनेचा उलगडा झाल्यावर पोलिसांनी पत्रकार परिषद घेत या खुनाची माहिती दिली. येथील डीएसपी मल्हीर खान यांनी सांगितले की, या घटनेची माहिती पोलिस स्टेशनला देण्यात आली होती. घरातील नगरिकांचा खून झाल्याचे निष्पन्न झाल्यावर तपास सुरू करण्यात आला होता. त्यांच्या मृत्यूचे कारण काही तरी गूढ आजार किंवा फूड पॉयझनिंग असल्याचे मानले जात आहे. खैरपूरचे एसएसपी समीउल्ला ह सोमरो यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी विविध बाजूंनी तपास सुरू केला होता. तपासा दरम्यान मृतांनी खाल्लेल्या अन्नात विष मिसळल्याचं पुढं आलं.
डीएसपी खान म्हणाले, आम्ही या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण विष्ण असल्याचं निष्पन्न झालं होतंन. या संयुक्त कुटुंबातील सर्वांचा मृत्यू झाला होता. फक्त ही तरुणी वाचली होती. या तरुणीची अनेकदा चौकशी करण्यात आली. मात्र, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, पोलिसांनी टीची कसून चौकशी केल्यावर तिने सर्वांच्या जेवणात विष टाकून त्यांची हत्या केल्याची कबुली दिली.
तरुणीला हे विष तिचा प्रियकर आमीर बख्श ब्रोही याने दिल्याचे तरुणीने तपासात सांगितले. या बाबत माहिती देतांना डीएसपी म्हणाले की, शाइस्ता ही आमिर बख्शच्या प्रेमात होती. परंतु त्याच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाला मान्यता दिली नाही. आमिरने तिला एक विषारी औषध देऊन ते जेवणात मिसळण्यास सांगितले. त्यानुसार तिने तसेच केले. दरम्यान विषयुक्त जेवण जेवल्याने सर्वांचा मृत्यू होईल आणि त्यांच्या मार्गातील अडथळा दूर होईल असे त्यांना वाटले. डीएसपी म्हणाले की, शाइस्ता आणि अमीर बख्श यांच्याविरोधात बाराडी जटोई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
संबंधित बातम्या