Fatehpur snake bite case : उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये विकास दुबे नावाच्या तरुणाने दावा केला होता की, त्याला ४० दिवसात सापाने ७ वेळा दंश केला आहे. या प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर सीएमओने चौकशीचे आदेश दिले होते. तपासासाठी डॉक्टरांचे एक पथक बनवले गेले होते. या पथकाने आपला अहवाल डीएमकडे सोपवला आहे. तीन सदस्यीय तपास समितीच्या मतानुसार विकासला केवळ एकदाच सर्पदंश झाला होता. विकास दुबे याला स्नेक फोबिया असून मानसोपचार तज्ज्ञाकडून त्यांच्यावर उपचार करण्याचा सल्ला अहवालातून दिला आहे.
विकास दुबे याला सात वेळा साप चावल्याच्या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने चौकशीसाठी तीन सदस्यीय टीम गठित केली होती. चार दिवसानंतर आता सीएमओच्या पथकाने तपासाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सोपवला आहे. यामध्ये एकदा साप चावल्याची पुष्टि झाली आहे.
डिप्टी सीएमओ आरके वर्मा यांनी सांगितले की, सहा वेळा केलेल्या उपचाराची बिले चेक केल्यानंतर समजते की, तरुणाला अँटीवेनम (साप चावल्यानंतरचे इंजेक्शन) देण्यात आले होते. अँटीबायोटिक आणि अन्य इंजेक्शही दिले गेले आहेत. चौकशीत त्याला स्नेक फोबिया असल्याचे समोर आले आहे. कुटूंबीयांशी बोलून त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार केले जातील.
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, हा तरुण मनोरुग्ण असून तो स्नेक फोबियाचा बळी ठरला आहे. सात वेळा साप चाव्याचा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. विकासला एकदाच साप चापला होता. पण यानंतर त्याच्या मनात सापाची भीती बसली आणि यातून त्याने सहा वेळा आपल्याला साप चावल्याचं सांगितलं.
विकासने दावा केला होता की, साप केवळ त्याच्या घरीच नाही तर नातेवाईकांच्या घरीही त्याला चावला होता. या घटनेमुळे कुटूंबीयांसह अन्य लोकही त्रस्त झाले होते. या वृत्ताने सर्वजण हादरले होते. या प्रकरणाचा राज्यात चर्चा सुरू झाल्यानंतर सरकारने चौकशीचे आदेश दिले. डॉक्टर्सची टीम गठित केली गेली. चार दिवसांच्या चौकशीनंतर सत्य बाहेर आले आहे. १६ जुलै रोजी समितीने आपला रिपोर्ट प्रशासनाला सोपवला.
फतेहपूर जिल्ह्यातील मलवा पोलीस ठाणे क्षेत्रातील सौरा गावात राहणाऱ्या विकास दुबे या तरुणाने दावा केला होता की, २ जून रोजी रात्री ९ वाजता त्याला अंथरुणात पहिल्यांदा साप चावला होता. त्यानंतर कुटूंबीयांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर दावा केला गेला की, आठवड्याला सर्पदंशाची घटना घडू लागली. सात वेळा साप चावल्याचे विकाने म्हटले. विकासने म्हटले की, सात चावण्यापूर्वी त्याला भास होत होता की, साप हल्ला करणार आहे.
विकासने सांगितले की, सर्वांनी त्याला घरापासून काही दिवस दूर राहण्याचा सल्ला दिला. जेणेकरून सापाची भीती मनातून जाईल. यानंतर विकास मावशीच्या घरी जाऊन राहिला. मात्र सापाचे त्याचा पिच्छा सोडला नाही. २८ जून रोजी मावशीच्या घरीही सापाने विकासचा चावा घेतला.मात्र आता या समस्येचे सत्य समोर आले आहे.
संबंधित बातम्या