बागेश्वर धामचे महंत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे धाकटे बंधू शालिग्राम उर्फ सौरव गर्ग यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते धीरेंद्र शास्त्रीसोबतचे आपले सर्व संबंध तोडण्याबाबत बोलताना दिसत आहे. मात्र, हिंदुस्थान टाइम्स मराठीने या व्हिडिओच्या सत्यतेला दुजोरा दिलेला नाही. त्यांच्यामुळे पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रतिमेला धक्का बसला आहे, असे शालिग्राम यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. त्याबद्दल तो माफी मागतो. आता धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याशी त्यांचा संबंध नाही. आपल्या निर्णयाची माहिती कौटुंबिक न्यायालयाला दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
शालिग्राम गर्ग यांनी म्हटले आहे की, 'जय श्रीराम, आम्ही आज तुम्हा सर्वांना आमच्या कुटुंबाची आणि अत्यंत महत्त्वाच्या घोषणेची माहिती देणार आहोत. हे सर्व सनातनींच्या श्रद्धेबद्दल आणि श्री बागेश्वर धामच्या गौरवाबद्दल आहे. आजपर्यंत सनातनी हिंदूंची, बागेश्वर महाराजांची आणि धामची प्रतिमा आमच्यामुळे मलीन झाली आहे. या घटनेबद्दल आम्ही पूज्य बालाजी सरकार आणि बागेश्वर महाराज यांची माफी मागतो. आजपासून आमचा किंवा आमच्या कोणत्याही प्रजेचा संबंध बागेश्वर धाम आणि महाराजांशी जोडता कामा नये.
सुमारे दोन मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये शालिग्राम गर्ग यांनी यापूर्वी केलेल्या कृत्याबद्दल माफी मागितली आहे. शालिग्राम गर्ग यांनी व्हिडिओ जारी करत म्हटले आहे की, त्यांच्या कृतीमुळे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची प्रतिमा सतत मलिन होत आहे. आता पुन्हा असे घडू नये अशी त्यांची इच्छा आहे, म्हणून धीरेंद्र कृष्ण शास्त्रींसोबतचे नाते आयुष्यभरासाठी संपुष्टात आणत आहेत. माझे कोणतेही काम धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याशी जोडले जाऊ नये.
शालिग्राम गर्ग यांनी आपल्या व्हिडिओमध्ये असेही म्हटले आहे की, धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याशी कायदेशीररित्या संबंध तोडण्यासाठी त्यांनी कौटुंबिक न्यायालयात अर्ज ही दाखल केला आहे. त्याची प्रत शालिग्राम गर्ग यांच्याकडे आहे. शालिग्राम गर्ग हे अनेक वादात सापडले आहेत. त्यांच्यावर मारहाण, बेकायदा शस्त्र बाळगणे यासह अनुसूचित जाती-जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकताच त्याच्यावर टोलनाक्यावर हल्ला केल्याचा आरोप झाला होता.
नुकतीच धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी हिंदू जोडो यात्रा काढली होती, ज्यात लाखो लोक, अनेक मोठे सेलिब्रिटी आणि संत सहभागी झाले होते. त्यात शालिग्राम गर्गही दिसले होते. शालिग्राम गर्ग यांनी हा निर्णय अशावेळी घेतला आहे, जेव्हा धीरेंद्र शास्त्री हिंदू समाजातील लोकांना एकत्र येण्याचे आवाहन करत आहेत. ते जातीयवाद संपवण्यासाठी आवाज उठवत आहेत आणि भारताला भव्य बनवण्याची भाषा करत आहेत.
संबंधित बातम्या