जनतेचा निर्णय आम्हाला मान्य; आम्ही चांगला लढा दिला, दिल्ली हातातून निसटल्यावर काय म्हणाले केजरीवाल? VIDEO
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  जनतेचा निर्णय आम्हाला मान्य; आम्ही चांगला लढा दिला, दिल्ली हातातून निसटल्यावर काय म्हणाले केजरीवाल? VIDEO

जनतेचा निर्णय आम्हाला मान्य; आम्ही चांगला लढा दिला, दिल्ली हातातून निसटल्यावर काय म्हणाले केजरीवाल? VIDEO

Updated Feb 08, 2025 03:27 PM IST

Arvind Kejriwal on Delhi Election Result: दिल्ली निवडणुकीत आपला मोठा धक्का बसला असून भाजपने २७ वर्षानंतर सत्तेत पुनरागमन केले आहे. या निकालावर अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली असून आपल्या निवेदनात त्यांनी भाजपचं अभिनंदन करत जनतेचा निर्णय नम्रतेने स्वीकारत असल्याचे म्हटले आहे.

अरविंद केजरीवाल
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal on Delhi Election Result: दिल्लीत आपची हॅट्रीकची संधी हुकली आहे. त्याचबरोबर अरविंद केजरीवाल यांनाही परभवाचा धक्का बसला आहे. या पराभवानंतर आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हणाले, आम्ही जनतेचा जनादेश अत्यंत नम्रतेने स्वीकारतो. या विजयाबद्दल मी भाजपाचे अभिनंदन करतो. मला आशा आहे की, ज्या आश्वासनांसाठी जनतेने त्यांना मतदान केले आहे, ती सर्व आश्वासने ते पूर्ण करतील.

काय म्हणाले अरविंद केजरीवाल -

'आप'चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आपल्या सरकारच्या कामांचा दाखला दिला. गेल्या दहा वर्षांत आरोग्य, शिक्षण, वीज, पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात आम्ही बरीच कामे केली आहेत. आम्ही केवळ विधायक विरोधी पक्षाची भूमिका बजावणार नाही, तर जनतेत राहून त्यांची सेवा करू. आम्ही राजकारणात सत्तेसाठी आलो नाही. सत्ता केवळ लोकांच्या गरजा पूर्ण करण्याचे साधन आहे. या निवडणुकांमध्ये उत्तम काम केल्याबद्दल मी आम आदमी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो, असंही अरविंद केजरीवाल म्हणाले.

नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या केजरीवाल यांना स्वत:ची जागा राखता आलेली नाही. भाजपचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी केजरीवाल यांचा ४०८९ मतांनी पराभव केला. प्रवेश वर्मा यांना ३०,०८८ तर अरविंद केजरीवाल यांना २५,९९९ मते मिळाली.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिबसिंह वर्मा यांचे चिरंजीव प्रवेश वर्मा यांनी आपल्या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीच्या जनतेला दिले आहे. मात्र, निवडणूक आयोगाने अद्याप नवी दिल्ली मतदारसंघातून विजयी उमेदवाराची घोषणा केलेली नाही.

दिल्ली निवडणुकीचा निकाल हा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या विरोधात असल्याचे काँग्रेसने म्हटले होते. दिल्लीच्या जनतेने फसवणुकीचे आणि फसवणुकीचे राजकारण नाकारले आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिल्लीत काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल, अशी आशा व्यक्त केली होती.

भाजपच्या हुकूमशाही व गुंडगिरीविरोधात आमचा लढा सुरूच राहणार - अतिशी

या निवडणूक निकालांना 'आप'साठी धक्का असल्याचे सांगत दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या की, आम्ही जनतेचा जनादेश स्वीकारतो. भाजपच्या हुकूमशाही आणि गुंडगिरीविरोधात आमचा लढा सुरूच राहणार आहे. कालकाजीच्या जनतेचे आणि भाजपच्या गुंडगिरीला सामोरे गेलेल्या कार्यकर्त्यांचे मी आभार मानते. दिल्लीच्या जनतेसाठी आमचा लढा सुरूच राहणार आहे.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर