काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मध्य प्रदेशातील महू येथे केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. प्रयागराजमधील महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर खर्गे यांनी गंगेत डुबकी मारल्याने दारिद्र्य दूर होते का, अन्न मिळते का, असा प्रश्न उपस्थित केला. काँग्रेस अध्यक्षांच्या या वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाला आहे. भाजपने याला हिंदूंचा द्वेष म्हटले असून काँग्रेस पक्ष आता नवीन मुस्लीम लीग बनला असल्याची टीका केली आहे.
'जय बापू, जय भीम, जय संविधान'च्या घोषणा देण्यासाठी काँग्रेस पक्षाने सोमवारी मध्य प्रदेशात रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी खर्गे यांनी संविधान आणि बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्यावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. मनुवादाचे अनुसरण केल्यास गरिबांचा नाश होईल, असे खर्गे म्हणाले. सर्वांनी एकत्र येऊन मनुवाद संपवावा, असे आवाहन त्यांनी केले.
यानंतर महाकुंभाचे नाव न घेता खर्गे यांनी मोठं वक्तव्य केलं. मात्र, त्यांनी माफी ही मागितली आणि आपण कोणाच्याही श्रद्धेला ठेच पोहोचवू इच्छित नसल्याचे सांगितले. खर्गे म्हणाले, "अरे भाऊ, गंगेत डुबकी मारल्याने दारिद्र्य दूर होते का, पोटाला अन्न मिळते का? मला कोणाच्याही श्रद्धेवर प्रश्न उपस्थित करायचे नाही. कुणाला दुखावले गेले असेल तर (हात जोडून) मी माफी मागतो. पण मला सांगा, जेव्हा मूल उपाशी मरत आहे, मूल शाळेत जात नाही, मजुरांना मजुरी मिळत नाही, तेव्हा हे लोक जाऊन हजारो रुपये खर्च करत आहेत. ते स्पर्धेत घसरण करत आहेत. टीव्हीवर चांगले काही येत नाही तोपर्यंत डुबकी मारत राहतात. असे लोक देशाचे भले करणार नाहीत.
भाजपने खर्गे यांच्या विधानावर पलटवार करत काँग्रेस ही नवी मुस्लीम लीग बनली असल्याचा टीका केली. भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी खर्गे यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, "खर्गेजी बोलत आहेत, मात्र शब्द गांधी घराण्याचे आहेत. काँग्रेसला हिंदूंचा इतका तिरस्कार का आहे? महाकुंभ १४४ वर्षातून एकदा येतो, पण काँग्रेसचे नेते इतके हताश झाले आहेत की ते हिंदूंना शिव्या देत आहेत. यापूर्वी काँग्रेसचे हुसेन दळवी यांनी कुंभमेळ्याला वाईट म्हटले होते आणि आता खुद्द काँग्रेस अध्यक्षांनी यावर द्वेषपूर्ण टिप्पणी केली आहे. काँग्रेस आता नवी मुस्लीम लीग बनली आहे. हा पक्ष देशासाठी कॅन्कर (नासूर) बनला आहे. त्याचे नष्ट होणे हे सर्वांच्याच हिताचे आहे.
भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, महाकुंभ हे लाखो वर्षांपासून सनातन श्रद्धेचे प्रतीक आहे, काँग्रेस पक्ष आणि त्याचे अध्यक्ष त्याची खिल्ली उडवत आहेत. मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाकुंभ स्नानाबाबत केलेले विधान अत्यंत लज्जास्पद आहे. इफ्तार पार्टी आणि हज यात्रेबाबत काँग्रेस पक्ष हेच लज्जास्पद विधान करू शकतो का? संबित पात्रा म्हणाले की, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे.
संबंधित बातम्या