Chhattisgarh encounter: बस्तरच्या जंगलात भीषण चकमक; सुरक्षा दलाकडून ३० नक्षलवाद्यांचा खात्मा, अजून वाढू शकतो आकडा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Chhattisgarh encounter: बस्तरच्या जंगलात भीषण चकमक; सुरक्षा दलाकडून ३० नक्षलवाद्यांचा खात्मा, अजून वाढू शकतो आकडा

Chhattisgarh encounter: बस्तरच्या जंगलात भीषण चकमक; सुरक्षा दलाकडून ३० नक्षलवाद्यांचा खात्मा, अजून वाढू शकतो आकडा

Published Oct 04, 2024 09:06 PM IST

Naxalists killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. नारायणपूर-दंतेवाडा सीमेवरील जगंलात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत आतापर्यंत ३० नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

बस्तरच्या जंगलात भीषण चकमक (संग्रहित छायाचित्र)
बस्तरच्या जंगलात भीषण चकमक (संग्रहित छायाचित्र)

Bastar Encounter :  छत्तीसगड राज्यात नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. बस्तर जिल्ह्यातील नारायणपूरमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ३० नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. या परिसरात अजूनही चकमक सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्राशस्त्रे व दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.  

बस्तर पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, नारायणपूर-दंतेवाडा आंतरजिल्हा सीमेवरील अभुजमाडच्या जंगलात दुपारी एकच्या सुमारास सुरक्षा दलाचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर गेले असताना चकमक सुरू झाली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जवळपास ३० नक्षलवादी मारले गेले आहेत. नक्षलवाद्यांचा मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. नारायणपूरचे एसपी प्रभात कुमार यांनी चकमक सुरू असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तसेच चकमकीत सर्व जवान सुरक्षित असल्याचे सांगितले. पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी सांगितले की, चकमक सुरू असून आतापर्यंत २८ मृतदेह सापडले आहेत.

नारायणपूर आणि दंतेवाडाच्या सीमेवरील अबूझमाड भागात नारायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्यातील जवानांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. चकमकीसोबतच जवानांकडून सर्च ऑपरेशनही सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवानांनी आतापर्यंत जवळपास ३० नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. हा आकडा आणखी वाढू शकतो. घटनास्थळावरून एके ४७, एसएलआरसह इतर अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. नारायणपूरचे एसपी प्रभात कुमार जवानांच्या संपर्कात आहेत.  

प्रभातकुमार यांच्या नेतृत्वाखाली छत्तीसगडच्या बस्तर विभागातील नारायणपूरच्या अबूझमाड परिसरात पोलिसांना ऐतिहासिक यश मिळाले आहे. त्यामुळे राज्यातील उच्चपदस्थांपासून बस्तरचे आयजी पी. सुंदरराज पर्यंत ते या संपूर्ण कारवाईवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.  

कांकेर जिल्ह्यात १६ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी २९ माओवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर सुरक्षा दलांचे हे दुसरे मोठे यश आहे.

दंतेवाडा-नारायणपूरच्या  घनदाट जंगलात नक्षलवादी लपल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी जंगलात शोधमोहीम सुरू करून नक्षलवाद्यांना घेरण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरु केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात ३० नक्षलवादी ठार झाले आहेत. या भागात दोन तास चकमक सुरु होती. या नक्षलवाद्यांना टिपण्यासाठी सर्च जंगलात ऑपरेशन राबवण्यात येत आहे. 

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर