सवर्णांच्या शवपेटीवरील शेवटचा खिळा म्हणजे जातीय जनगणना; Brahmin Genes वाल्या अनुराधा तिवारीचा आता कुणावर निशाणा?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  सवर्णांच्या शवपेटीवरील शेवटचा खिळा म्हणजे जातीय जनगणना; Brahmin Genes वाल्या अनुराधा तिवारीचा आता कुणावर निशाणा?

सवर्णांच्या शवपेटीवरील शेवटचा खिळा म्हणजे जातीय जनगणना; Brahmin Genes वाल्या अनुराधा तिवारीचा आता कुणावर निशाणा?

Updated Sep 03, 2024 09:16 PM IST

caste census : अनुराधा तिवारी यांनी एक्सवर लिहिले की, 'एकीकडे तुम्ही हिंदू ऐक्याचा उपदेश करता. दुसरीकडे त्यांना जातीय जनगणना हवी आहे. या जनगणनेमुळे सामान्य प्रवर्गातील लोकांना मिळणाऱ्या काही संधीही हिरावून घेतल्या जाणार आहेत.

अनुराधा तिवारी
अनुराधा तिवारी

बेंगळुरूच्या एका कंपनीच्या सीईओ अनुराधा तिवारी यांनी पुन्हा एकदा एक पोस्ट टाकून जातीय जनगणना चुकीची असल्याचे म्हटले आहे. आपल्या फोटोसह ब्राह्मण जीन्स असे कॅप्शन लिहून प्रकाशझोतात आलेली अनुराधा तिवारी सतत एक्सवर पोस्ट लिहित असते. एकीकडे तुम्ही हिंदू ऐक्याचा उपदेश करता आणि दुसरीकडे तुम्हाला जातीय जनगणना हवी आहे. अनुराधा तिवारी यांनी आपल्या पोस्टमध्ये कोणत्याही व्यक्तीचे किंवा संस्थेचे नाव घेतलेले नाही. पण सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यासंदर्भात निवेदन दिले होते की, आम्ही जातीय जनगणनेच्या विरोधात नाही, पण त्याचा राजकीय वापर करू नये.

अशा परिस्थितीत कदाचित अनुराधा तिवारी यांनी आरएसएसच्या वक्तव्यावरून ही पोस्ट लिहिली असावी, असाही अंदाज बांधला जात आहे. अनुराधा तिवारी यांनी लिहिले की,  'एकीकडे तुम्ही हिंदू ऐक्याचा उपदेश करता. दुसरीकडे जातीय जनगणना हवी आहे. या जनगणनेमुळे सामान्य प्रवर्गातील लोकांना ज्या काही संधी मिळत आहेत. त्या  मिळणाऱ्या संधीही हिरावून घेतल्या जाणार आहेत. प्रत्येक धोरण आधीपासूनच सामान्य प्रवर्गाच्या विरोधात आहे. आता ही जातीय जनगणना सवर्णांच्या शवपेटीतील शेवटचा खिळा ठरणार आहे.  दुसऱ्या एका पोस्टमध्ये तिने लिहिलं आहे की, जेव्हा इतर समाजातील लोक वाईट असतात तेव्हा त्यांना वाईट म्हटलं जातं. परंतु ब्राह्मण केवळ ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना वाईट ठरवलं जातं.

नुकतंच लेखक चेतन भगत यांनीही अनुराधा तिवारी यांच्या पोस्टवर सल्ला देत ट्विट केलं आहे. विरोधकांना जातीचा मुद्दा आवडतो कारण तो हिंदू ऐक्याला छेद देतो. त्याचप्रमाणे ब्राह्मण जीन्सबाबतही विरोधकांना बोलायला आवडेल. यावर अनुराधा तिवारी यांनी जातीय जनगणना, आरक्षण यांसारख्या मुद्द्यांमुळे हिंदू ऐक्याला धोका निर्माण होत नाही का, असा प्रश्न उपस्थित केला होता.

३० ऑगस्ट रोजी अनुराधा तिवारी यांनी एक ट्विट केलं होतं. त्यात त्यांनी लिहिले होते की, सवर्ण या देशात सर्वाधिक कर भरतात. मग तोच कर जातीच्या जनगणनेत वापरावा लागतो. आणि आरक्षण वाढवण्यासाठी जातीय जनगणनेचा वापर केला जाईल. अशा प्रकारे आम्ही स्वत:च्या शवपेटीचा खर्च करत आहोत.'

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर