Delhi Election Result: तब्बल २७ वर्षानंतर दिल्लीत कमळ फुललं; अरविंद केजरीवालांची हॅट्ट्रीक हुकली!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Delhi Election Result: तब्बल २७ वर्षानंतर दिल्लीत कमळ फुललं; अरविंद केजरीवालांची हॅट्ट्रीक हुकली!

Delhi Election Result: तब्बल २७ वर्षानंतर दिल्लीत कमळ फुललं; अरविंद केजरीवालांची हॅट्ट्रीक हुकली!

Ashwjeet Jagtap HT Marathi
Published Feb 08, 2025 12:35 PM IST

BJP vs AAP: दिल्लीत तब्बल २७ वर्षानंतर भाजपचे सरकार स्थापन होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

तब्बल २७ वर्षानंतर दिल्लीत कमळ फुललं
तब्बल २७ वर्षानंतर दिल्लीत कमळ फुललं (Video Grab)

Delhi Assembly Elections Result: तब्बल २७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय जनता पक्ष (BJP) दिल्ली विधानसभेत (Delhi Elections) पुनरागमन करताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलानुसार भाजप ४३ जागांवर आघाडीवर आहे. तर, दिल्लीत सलग दोन वेळा सरकार चालवणारा आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) २८ जागांवर घसरताना दिसत आहे. यावेळीही काँग्रेसच्या (Congress) पदरात निराशाच पडली. भाजपच्या या मोठ्या विजयाचा आनंद पंतप्रधान नरेंद्र मोदीही (PM Narendra Modi) साजरा करणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी कार्यकर्त्यांना संबोधित करतील.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात नव्हे तर दिल्ली भाजप कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांना संबोधित करतील. तेथे तयारी सुरू झाली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला निर्णायक आघाडी मिळताच भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांनी राजधानीतील मुख्यालयात जल्लोष करण्यास सुरुवात केली. ढोल-ताशांच्या तालावर समर्थकांनी नाचत पक्षाचे झेंडे फडकावले. भाजपचे चिन्ह कमळाचे कटआऊट हातात घेऊन समर्थकांनी एकमेकांना भगव्या रंगाने रंगवले.

सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला लक्षणीय आघाडी मिळाल्याचे दिसून आल्यानंतर पक्षाच्या दिल्ली शाखेचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी राष्ट्रीय राजधानीत भाजप सरकार स्थापन करेल, असा विश्वास व्यक्त केला. दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असेल आणि त्याबाबतचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल, असेही ते म्हणाले. कनॉट प्लेसयेथील हनुमान मंदिरात पूजा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आतापर्यंतचे निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणे आहेत, परंतु आम्ही अंतिम निकालाची वाट पाहू, असेही ते म्हणाले.

नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार संदीप दीक्षित यांनी निवडणुकीतील पक्षाच्या निराशाजनक कामगिरीवर आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त करताना दिल्लीकरांच्या हृदयात जागा निर्माण करण्यात पक्ष अपयशी ठरल्याची कबुली दिली, ही निराशाजनक बाब आहे. राष्ट्रीय राजधानीसाठी सध्या सुरू असलेल्या मतमोजणीत काँग्रेसला विधानसभेच्या ७० जागांवर कोणतीही आघाडी मिळताना दिसत नाही. एकूणच दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ चे निकाल काँग्रेससाठी आत्मपरीक्षणाची संधी आहेत. पक्षाने हा धडा आत्मसात केल्यास भविष्यात तो एक भक्कम पर्याय म्हणून उदयास येऊ शकतो.

हा निकाल पक्षाच्या सध्याच्या रणनीतीचे अपयश तर दर्शवितोच, शिवाय भविष्यासाठी महत्त्वाचे धडेही देतो. काँग्रेसच्या पराभवाची खरी कारणे अंतिम निवडणूक निकालानंतरच कळू शकणार असली तरी सध्याची परिस्थिती बरेच काही सांगत आहे.

Ashwjeet Jagtap

TwittereMail

अश्वजीत जगताप हिंदुस्तान टाइम्स मराठीमध्ये सीनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहे. अश्लजीत येथे राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स, टेक्नोलॉजी, ऑटो, व्हायरल न्यूज आणि करिअर संबंधित बातम्या लिहितो. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात एकूण ५ वर्षांचा अनुभव आहे. यापूर्वी लेटेस्टली- मराठी (डिजिटल), एबीपी माझा (डिजिटल) मध्ये कामाचा अनुभव. अश्वजीतला क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळणे आणि बायोपिक चित्रपट पाहायला आवडतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर