Bilkis Bano Case : दोषींना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाही, २१ जानेवारीपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bilkis Bano Case : दोषींना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाही, २१ जानेवारीपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Bilkis Bano Case : दोषींना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाही, २१ जानेवारीपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Published Jan 19, 2024 05:08 PM IST

Bilkis Bano Case : बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील ११ दोषींनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत त्यांना २१ जानेवारीपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत.

Bilkis Bano Case
Bilkis Bano Case

बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींनी आत्मसमर्पणापासून दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ११ पैकी १० दोषींची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामध्ये वेगवेगळी कारणे देऊन आत्मसमर्पणापासून दिलासा देण्याची मागणी केली होती. सुनावणी वेळी जस्टिस नागरथाना यांनी म्हटले की, याचिकेला रिकॉर्डवर घेतले आहे. यावेळी खंडपीठाने म्हटले की, याचिकेत काही दम नाही. यामुळे या याचिका आम्ही फेटाळून लावत आहे. त्याचबरोबर सर्व दोषींनी २१ जानेवारीपर्यंत पोलिसांसमोर आत्मसमर्पण करावे.

बिल्किस बानो प्रकरणातील ११ पैकी १० दोषींनी सर्वाच्च न्यायलयात याचिका दाखल केली होती.  पीडितेवर बलात्कार व तिच्या नातेवाईकांची हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या १० दोषींनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. दोषींनी आत्मसमर्पण करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. या याचिकांवर शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली तसेच कोर्टाने सर्व याचिका फेटाळून लावल्या.

 

या याचिकांवर SC मध्ये झाली सुनावणी -

  1. गोविंदभाई नाई याने कोर्टात म्हटले होते की, त्यांच्या वडिलांचे वय ८८ वर्षे तर आईचे ७५ वर्षे आहे. त्यांचा सांभाळ करणास ते एकमेव व्यक्ती आहेत.
  2.  रमेश रूपाभाई चंदना याने म्हटले होते की, त्यांना आपल्या मुलाच्या लग्नाची तयारी करायची आहे.
  3.  मितेश चिमनलाल भट्ट याने म्हटले होते की, त्याचे हिवाळ्यातील पीक कापणीसाठी तयार आहे. त्यामुळे आत्मसमर्पण करण्यापूर्वी त्यांना हे काम पूर्ण करण्याची इच्छा आहे.
  4. प्रदीप रमणलाल मोढिया याने म्हटले होते की, त्याच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया झाली असून बरे होण्यास त्यांना अजून वेळ लागणार आहे.
  5. बिपिनचंद कनियालाल जोशी याने म्हटले होते की, नुकतीच त्याच्या पायावर शस्त्रक्रिया केली असून तो आंशिक रूपाने अंपग आहे.
  6. जसवंतभाई चतुरभाई नाई याने म्हटले की, त्याची पीक काढणीला आल्याने वेळ द्यावा.
  7. राधेश्याम भगवानदास शाह याने म्हटले होते की, त्याला वृद्ध आई-वडिलांची सेवा करायची आहे. त्याचा मुलगा कॉलेजमध्ये शिकत आहे. यामुळे आत्मसमर्पण करण्यापूर्वी त्याला कुटूंबासाठी आर्थिक व्यवस्था करायची आहे.
  8. केशरभाई खीमाभाई वोहनिया याने वृद्धापकाळाचा हवाला देत म्हटले होते की, त्याच्या मुलाचे लग्न ठरले आहे.
  9. शैलेशभाई चिमनलाल भट्ट याने वृद्धावस्था व कुटूंबातील लग्न तसेच शेतीचे कारण दिले होते. 
  10. राहुभाई बाबूलाल सोनी याने आईचे वाढते वय तसेच पाठीच्या मणक्याच्या ऑपरेशनचे कारण दिले. पत्नीच्या प्रकृतीचेही कारण दिले.
  11.  बकाभाई खीमाभाई यांनी आत्मसमर्पणासाठी मुदत वाढवण्याची मागणी करताना न्यायालयात याचिका दाखल केली नव्हती.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर