अखनूरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी Artificial Intelligence ने कशी मदत केली; यशस्वी ऑपरेशननंतर लष्कराचा खुलासा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अखनूरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी Artificial Intelligence ने कशी मदत केली; यशस्वी ऑपरेशननंतर लष्कराचा खुलासा

अखनूरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी Artificial Intelligence ने कशी मदत केली; यशस्वी ऑपरेशननंतर लष्कराचा खुलासा

Updated Oct 29, 2024 08:37 PM IST

artificial intelligence in Army : लष्कराने मंगळवारी खुलासा केला की, अखनूर ऑपरेशनमध्ये त्यांच्या टीमने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी एआयचा वापर केला होता. या कारवाईत लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले असून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र (AP)

जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये लष्कराच्या ताफ्यातील रुग्णवाहिकेवर गोळीबार करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले. लष्कराने मंगळवारी खुलासा केला की, अखनूर ऑपरेशनमध्ये त्यांच्या टीमने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर केला. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (artificial intelligence) मदतीने दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत आम्हाला जलद आणि यशस्वी परिणाम कसे मिळाले, याची माहिती लष्कराने पत्रकार परिषदेत दिली. 

दहशतवादविरोधी कारवाई दरम्यान लष्कराने फँटम हा चार वर्षांचा स्निफर कुत्रा गमावला. शोध मोहिमेदरम्यान तो पथकात आघाडीवर होता आणि दहशतवाद्यांनी त्याला गोळ्या घातल्या. लष्करी कुत्र्याच्या बलिदानामुळे अनेक लष्करी जवानांचे प्राण वाचले.

भारतीय लष्करातील मेजर समीर श्रीवास्तव यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले की, जम्मू-काश्मीरमधील अखनूर येथे दहशतवाद विरोधी कारवाईत लष्कराने मानवरहित वाहने आणि एआयचा वापर केला. हे आपल्याला जलद आणि यशस्वी परिणाम मिळविण्यास मदत करते. या कारवाईनंतर लष्कराने दहशतवाद्यांविरोधात बीएमपी टँक चा वापर केल्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, होय आम्ही त्याचा वापर केला कारण हा भूप्रदेश खूप कठीण होता आणि आम्हाला त्वरित परिणाम मिळवायचे होते.

जीओसी १० इन्फंट्री डिव्हिजनचे मेजर समीर श्रीवास्तव म्हणाले, 'दहशतवादविरोधी मोहिमेदरम्यान आम्ही शोध मोहीम राबवत असताना आर्मी डॉग फँटम आघाडीवर होता. दहशतवाद्यांनी कुत्र्यावर गोळीबार केला. त्यांच्या त्यागामुळेच आमचे अनेकांचे प्राण वाचले. दहशतवाद्यांच्या हल्ल्यापासून सैनिकांचे रक्षण करण्याच्या प्रयत्नात फँटमला गोळी लागली. 

जनरल श्रीवास्तव यांनी एएनआयला सांगितले की, जेव्हा आम्हाला आमच्या सूत्रांकडून गावात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली तेव्हा आम्ही ताबडतोब कारवाई करण्याचा निर्णय घेतला. आपली योजना पूर्ण होत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी आमच्या ताफ्यावर गोळीबार केला. ज्या प्रकारे दहशतवादी सशस्त्र होते, त्यावरून आम्हाला वाटते की ते काही तरी मोठा प्लॅन घेऊन येथे आले होते. दहशतवादी संघटनांनी काहीतरी मोठं करण्याच्या तयारीत असल्याची पोस्ट  त्यांनी केली होती.  त्यामुळे आम्ही सज्ज होतो आणि गुप्तचर यंत्रणांसह सर्व संघटनांची मदत घेत होतो.

दहशतवाद्यांनी लष्कराच्या रुग्णवाहिकेवर गोळीबार केला, त्यानंतर तात्काळ प्रत्युत्तर देण्यात आले. हा परिसर तात्काळ सील करण्यात आला आणि जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली. या प्रत्युत्तरात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर