महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात आता अमित शहांची मध्यस्थी, दोन्ही मुख्यमंत्र्यांना दिली पंचसूत्री
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात आता अमित शहांची मध्यस्थी, दोन्ही मुख्यमंत्र्यांना दिली पंचसूत्री

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात आता अमित शहांची मध्यस्थी, दोन्ही मुख्यमंत्र्यांना दिली पंचसूत्री

Dec 14, 2022 10:25 PM IST

Amit shah on Maharashtra Karnataka border dispute : नवी दिल्लीत महाराष्ट्र व कर्नाटक सीमावादावर अमित शहांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. यात सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती अमित शहा यांनी दिली आहे.

सीमावादावर बैठक
सीमावादावर बैठक

Maharashtra Karnataka border dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर आज नवी दिल्लीत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली, याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईआणि कर्नाटकचे गृहमंत्री उपस्थित होते. या बैठकीनंतर यातील निर्णयांची माहितीगृहमंत्री अमित शाह यांनी प्रसारमाध्यमांना दिली. या बैठकीत महाराष्ट्राच्या बाजूने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी योग्य पद्धतीने बाजू मांडावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती.

 

अमित शहांनी म्हटले की, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात सीमावाद निर्माण झाला होता. या वादाचा शेवट आणि त्यावर संवैधानिक मार्ग काढण्यासाठी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री व कर्नाटकचे मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांना आज इथे बोलवलं होतं.  दोन्ही बाजूंशी भारत सरकारच्या गृह विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चांगल्या वातावरणात बोलणी झाली. दोन्ही बाजूंनी सकारात्मक भूमिका ठेवली आहे.

  • जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा यासंदर्भात निर्णय येत नाही, तोपर्यंत कुणीही राज्य एकमेकांच्या प्रदेशावर दावा सांगणार नाही. दोन्ही राज्यांचे मिळून दोन्ही बाजूंनी तीन – तीन असे सहा मंत्री एकत्र बसून यासंदर्भात सविस्तर चर्चा करतील.
  • दोन्ही राज्यांमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नीट राहील. अन्य भाषेच्या लोकांना तसंच प्रवाशांना, व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी सिनियर आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली दोन्ही राज्य कमिटी बनवण्यासाठी सहमत झाल्या आहेत. ही समिती संविधानाच्या अखत्यारीत कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करेल. सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत दोन्ही राज्य दावा करणार नाहीत, असं अमित शाह म्हणाले.
  • दोन्ही राज्यांमध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती सामान्य राहील, अन्यभाषिक व्यापारी किंवा सामान्य लोकांना कोणत्याही प्रकारचा मनस्ताप सहन करावा लागू नये यासाठी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली दोन्ही राज्य एक समिती तयार करण्यावर सहमत झाले आहेत. ही समिती कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करेल.
  • आजच्या बैठकीत सर्वसंमत्तीने निर्णय झाला. मी आवाहन करतो राजकीय विरोध काहीही असो, विरोधक राजकीय कार्यक्रम घेऊ शकतात, पण दोन्ही राज्यांच्या हितासाठी याला राजकीय मुद्दा बनवू नका. या कमिटीचा अहवाल आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णयाची वाट पाहिली पाहिजे.
  • या संपूर्ण प्रकरणात बनावट ट्विटर खात्यांनीही मोठी भूमिका निभावली. काही सर्वोच्च नेत्यांच्या नावाने बनावट ट्विटर खाती तयार करून त्यावरून अफवा पसरवल्या गेल्या. हा प्रकार गंभीर यासाठी आहे की अशा प्रकारच्या ट्वीट्समुळे लोकांच्या भावना भडकवण्याचं काम होत आहे. त्यामुळे अशा बनावट खात्यांविरोधात गुन्हा दाखल केला जाईल.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर