अरे देवा.. ! २० विवाह, १०४ मुले अन् १४४ नातवंडे; या व्यक्तीने एकट्यानेच वसवले संपूर्ण गाव
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अरे देवा.. ! २० विवाह, १०४ मुले अन् १४४ नातवंडे; या व्यक्तीने एकट्यानेच वसवले संपूर्ण गाव

अरे देवा.. ! २० विवाह, १०४ मुले अन् १४४ नातवंडे; या व्यक्तीने एकट्यानेच वसवले संपूर्ण गाव

Published Mar 04, 2025 04:12 PM IST

एका माणसाने आपल्या कुटुंबाचा विस्तार अशा प्रकारे केला की, संपूर्ण गाव वसले. टांझानियाच्या या व्यक्तीने २० विवाह केले होते, त्यापैकी १६ पत्नी जिवंत आहेत. त्याला १०४ मुले आणि १४४ नातवंडे आहेत.

२० विवाह व १०४ मुले
२० विवाह व १०४ मुले

वाढती महागाई आणि खर्चामुळे लोक आता मर्यादित कुटुंबाचा मार्ग निवडू लागले आहेत. पण कुटुंब वाढवण्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची जगात कमतरता नाही. टांझानियातील एका व्यक्तीला कुटुंबाचा विस्तार करण्याची अशी नशा चढली की, त्याने २० लग्ने केली आणि त्यातून १०४ मुले झाली. इतकंच नाही तर या व्यक्तीला १४४ नातवंडेही आहेत. पल्स आफ्रिकेने दिलेल्या वृत्तानुसार, टांझानियातील झोम्बे नावाच्या छोट्याशा गावात हे मोठं कुटुंब राहतं.

वडिलांची इच्छा होती की, कुटुंब वाढलं पाहिजे -

२० विवाह केलेल्या या माणसाचं नाव आहे मजी अर्नेस्टो मुइनुची. या व्यक्तीने आपल्या प्रत्येक पत्नीसाठी स्वतंत्र घराची ही व्यवस्था केली आहे. शिवाय कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी एकट्या कुटूंब प्रमुखाच्या डोक्यावर नसून जे काम करू शकतात ते स्वत:चे काम करतात. मुईनुची सांगतात की त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांचे कुटुंब मोठे व्हावे. त्याच्या वडिलांनी सांगितले की, त्याचे कुळ लहान आहे, त्यामुळे हे वाढले पाहिजे. मुईनुचीला सात बहिणीही आहेत.

आफ्रिकन देश स्वतंत्र होत असताना १९६१ मध्ये मुइनुची यांचा जन्म झाला. मुईनुसी म्हणाले की, त्यांचे वडील म्हणायचे की एक पत्नी पुरेशी नाही. अशा तऱ्हेने त्याने स्वत: मुईनुचीचे पाच लग्न लावून दिले. त्यासाठी मुईनुचीच्या वडिलांना हुंडाही द्यावा लागला. बाकीचे लग्न मुईनुचीने स्वत: केले होते.

संपूर्ण कुटुंब शेतीच्या कामावर अवलंबून आहे. त्यांचे मोठे कुटुंब शेतीवर उदरनिर्वाह करते. ते केळी, सोयाबीन आणि मक्याची लागवड करतात. "लोकांना वाटेल की मी एवढं मोठं कुटुंब सांभाळतो, पण तसं नाही," मुईनुची म्हणाले,  कुटुंब सांभाळण्यात महिलांची खरी भूमिका असते आणि त्या हे सर्व करत असतात.

घरात वाद झाला तरी महिला स्वत:हून ते सोडवतात. वाद वाढला तर तो माझ्यापर्यंत पोहोचतो. "कधी कधी मी माझ्या मुलांची आणि नातवंडांची नावेही विसरतो. "मला जवळपास ५० नावं आठवतात, पण बाकीची नावे मी चेहऱ्याने ओळखतो आणि नावे आठवत नाहीत," ते म्हणाले. त्यांच्या ४० मुलांचा मृत्यू झाला आहे. काहींचा आजारपणामुळे तर काहींचा अपघातामुळे मृत्यू झाला.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर