Mumbai News: मध्य रेल्वेच्या अंबरनाथ आणि बदलापूरदरम्यान कर्जत लोकलमधून पडून एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. मंगळवारी (२२ ऑक्टोबर २०२४) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सायंकाळच्या सुमारास जवळपास सर्वच लोकल गाड्या कल्याणहून कर्जत आणि कसाराच्या दिशेने उशिराने धावतात. त्यामुळे घरी जाणाऱ्या चाकरमान्यांची लोकलमध्ये गर्दी होती. पाय ठेवायलाही जागा नसताना संबंधित महिला लोकलमध्ये चढली. दाराजवळ उभी असताना तिचा हात सटकला आणि ती खाली पडली. याची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तात्काळ महिलेला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, ऋतुजा गणेश जंगम असे मुंबई लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ऋतुजा एका खाजगी ट्रॅव्हल कंपनीत कामाला होती. ठाण्याहून कर्जत लोकलने परतताना अंबरनाथ रेल्वे स्थानकात गर्दीच्या रेट्यामुळे ती खाली उतरली. परंतु, घरी जायला उशीर होऊन म्हणून ती पुन्हा त्याच लोकलमध्ये चढली. मात्र, यावेळी तिला गर्दीमुळे आता जाताच आले नाही. ती दारातच उभी राहिली. अवघ्या काही अंतरावर गेल्यानंतर गर्दीमुळे तिचा हात सटकला आणि ती लोकलमधून खाली पडली.
या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ऋतुजालाला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. यामुळे लोकलमधून प्रवास करताना प्रवाशांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
मुंबई लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गेल्या आठवड्यात मंगळवारी घडली. डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. मृत तरुण मुंबई लोकलच्या दरवाजाजवळ उभा होता. मात्र, गर्दीमुळे अचानक त्याचा हात सटकला आणि तो धावत्या लोकलमधून खाली पडला.आयुष जतीन दोशी (वय, २०) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष हा लोकलमधून पडल्याची माहिती मिळताच त्वरीत आम्ही घटनास्थळी पोहोचून त्याला जखमी अवस्थेत डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात नेले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.' याप्रकरणी अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली.
संबंधित बातम्या