Mumbai Water Supply : मुंबईतील काही भागांत पाणीपुरवठा विस्कळीत; पिसे पंपिंग स्टेशनमध्ये पुन्हा बिघाड!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Water Supply : मुंबईतील काही भागांत पाणीपुरवठा विस्कळीत; पिसे पंपिंग स्टेशनमध्ये पुन्हा बिघाड!

Mumbai Water Supply : मुंबईतील काही भागांत पाणीपुरवठा विस्कळीत; पिसे पंपिंग स्टेशनमध्ये पुन्हा बिघाड!

Updated Jun 20, 2024 09:23 PM IST

Mumbai Water Shortage: मुंबईच्या पूर्व उपनगरांसह गोलंजी, फोसबेरी, रावली आणि भंडारवाडा जलाशयातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

पिसे पंपिंग स्टेशनमध्ये काही बिघाड झाल्याने मुंबईच्या काही भागांतील नागरिकांना पाणीपुरवठ्यावर परिणाम
पिसे पंपिंग स्टेशनमध्ये काही बिघाड झाल्याने मुंबईच्या काही भागांतील नागरिकांना पाणीपुरवठ्यावर परिणाम

Mumbai Water Cut: शेजारच्या ठाणे जिल्ह्यातील पिसे पंपिंग स्टेशनमध्ये काही बिघाड झाल्याने मुंबईच्या काही भागांतील नागरिकांना पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे. दुपारी २.५० च्या सुमारास यंत्रसामग्रीत बिघाड झाल्याने २० पैकी १३ पाण्याचे पंप बंद पडले. तेव्हापासून हे पंप पुन्हा सुरू करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे, असे महापालिकेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

मुंबईच्या पूर्व उपनगरांसह गोलंजी, फोसबेरी, रावली आणि भंडारवाडा जलाशयातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. सायंकाळी सात वाजेपर्यंत दहा पंप पुन्हा सुरू करण्यात आले असून उर्वरित तीन पंपांचे कामकाज सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सहा महिन्यांत दुसऱ्यांदा मुंबईचा पाणीपुरवठा विस्कळीत

पिसे पंपिंग स्टेशनमधील समस्यांमुळे सहा महिन्यांत दुसऱ्यांदा मुंबईचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यापूर्वी २६ फेब्रुवारी रोजी स्टेशनला लागलेल्या आगीमुळे २० पैकी १४ पंपांचे कामकाज ठप्प झाले होते. परिणामी महापालिकेने अनेक दिवस मुंबई आणि उपनगरात १५ टक्के पाणीकपात लागू केली होती. मुंबईतील पाणीकपातीची घोषणा पालिकेने केली नसली तरी कमी दाबाने पाणीपुरवठा करण्याचा इशारा दिला आहे. ठाणे आणि भिवंडी शहरआणि इतर बिगर शहरी भागात या काळात पाण्याचा दाब कमी होण्याची शक्यता आहे.

मुंबईत पावसाचा यलो अलर्ट

मुंबई, ठाणे आणि रायगड भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाचे मुख्य शास्त्रज्ञ सुनील कांबळे यांनी दिली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुंबईत पावसाचा वेग थोडा कमी झाला होता, मात्र आता पावसाने जोर धरला आहे. मान्सूनचा प्रवाह मध्यम प्रमाणात तीव्र होत आहे. येत्या 2-3 दिवसांसाठी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच संपूर्ण विदर्भासाठी यलो अलर्ट दिला आहे. उर्वरित महाराष्ट्रातही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला नाही, मात्र तेथेही मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहील, असे सुनील कांबळे यांनी सांगितले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर