मुंबईत आजपासून १० टक्के पाणी कपात! ठाणे, भिवंडीच्या पाणी पुरवठ्यावर देखील होणार परिमाण, पाणी जपून वापरण्याचे आवाहन
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबईत आजपासून १० टक्के पाणी कपात! ठाणे, भिवंडीच्या पाणी पुरवठ्यावर देखील होणार परिमाण, पाणी जपून वापरण्याचे आवाहन

मुंबईत आजपासून १० टक्के पाणी कपात! ठाणे, भिवंडीच्या पाणी पुरवठ्यावर देखील होणार परिमाण, पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dec 01, 2024 10:06 AM IST

Water reduction in Mumbai: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबईत आजपासून १० टक्के पाणी कपात लागू केली जाणार आहे. या पाणी कपातीचा परिणाम ठाणे व भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही होणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे.

मुंबईत आजपासून १० टक्के पाणी कपात! ठाणे, भिवंडीच्या पाणी पुरवठ्यावर देखील होणार परिमाण, पाणी जपून वापरण्याचे आवाहन
मुंबईत आजपासून १० टक्के पाणी कपात! ठाणे, भिवंडीच्या पाणी पुरवठ्यावर देखील होणार परिमाण, पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Water reduction in Mumbai: मुंबई नगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबईत पुढील पाच दिवस पाणी कपात केली जाणार आहे. तब्बल १० टक्के पाणी कपात केली जाणार आहे. १ ते ५ डिसेंबर नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. या कपातीचा परिणाम थके आणि भिवंडीवर देखील होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन मुंबई महानगर पालिकेने केले आहे.

मुंबई महागर पालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे या यंत्रणेची दुरुस्ती केली जाणार आहे. हेकाम आज पासून हाती घेण्यात येणार असून यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. या सोबतच उपनगर, ठाणे व भिवंडी महानगरपालिकेला होणाऱ्या पाणी पुरवठा देखील विस्कळीत होणार आहे. परिणामी पालिकेने पुढील १० दिवस १० टक्के पबई कपातीची घोषणा केली आहे.

या पूर्वी देखील दोन दिवस पाणी पुरवठा ठप्प झाला होता. लोअर परळ येथील तानसा जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने शहरातील काही भागातील पाणी पुरवठा हा बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर आता पिसे येथील पाणी पुरवठा यंत्रणेत बिघाड झाल्याने पाणी कपात केली जाणार आहे.

पालिकेने दिलेल्या महितीनुसार, न्यूमॅटिक गेट सिस्टिममच्या बिघाड दुरुस्त करण्यासाठी तांत्रिक दुरुस्तीचे काम आजपासून हाती घेण्यात आले आहे. महानगरपालिकेतर्फे मुंबई शहर - उपनगर, ठाणे व भिवंडी भागाला होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार असून मुंबई शहर व उपनगर तसेच ठाणे व भिवंडीला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात १० टक्के कपात कार्यात आली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर