गृहप्रकल्प न राबविलेल्या चढ्ढा नावाच्या खासगी विकासकाला पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली शासनाने बिनव्याजी ४०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री लाडका कंत्राटदार नंतर मुख्यमंत्री लाडका बिल्डर योजना महाराष्ट्रात येणार आहे का?असा संतप्त सवाल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रचितगड या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद घेत सरकारवर हल्लाबोल केला.
विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, अनुभव नसलेल्या चड्डा बिल्डरच्या घशात ४०० कोटी रुपये घातले आहे.बार्टीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती का नाही मिळाली? बिल्डरसाठी पैसे आहेत पण बार्टीच्या विद्यार्थ्यांसाठी पैसे नाहीत.
गृहप्रकल्प न राबविलेल्या चढ्ढा नावाच्या खासगी विकासकाला पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली शासनाने बिनव्याजी ४०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री लाडका कंत्राटदार नंतर मुख्यमंत्री लाडका बिल्डर योजना महाराष्ट्रात येणार आहे का? महाराष्ट्रात भ्रष्टाचार बोकाळला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीणनंतर मुख्यमंत्री लाडका कंत्राटदार योजना सुरु केली आहे. त्यात चड्डा नावाच्या कंत्राटदाराला ४०० कोटी रुपये द्यायचा निर्णय झाला आहे.हा चड्डा भाजपचा दिल्लीतील नगरसेवक होता,त्यानंतर काही काळ सीबीआयच्या ताब्यात होता," असा खळबळजनक दावाही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
महायुती सरकारने सरकारची तिजोरी खासगी बिल्डरसाठी खुली ठेवली आहे. हा महाराष्ट्राच्या तिजोरीवर जाता-जाता घातलेला दरोडा आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हा निर्णय मान्य आहे का हा देखील प्रश्न आहे. मे. चढ्ढा डेव्हलपर्स आणि प्रमोटर या दिल्लीस्थित कंपनीवर ही मेहेरनजर दाखविण्यात आली आहे. २०२१ मध्ये या विकासकाशी म्हाडाने करार केला. मात्र आतापर्यंत एकाही घराचा ताबा लाभार्थीना दिलेला नाही असे असताना त्याला ४०० कोटींची खिरापत का दिली जातेय. गृहनिर्माण विभागाने असा निधी देण्यास विरोध दर्शविला. त्यानंतरही हा निधीदेण्यासाठी कोण दबाव आणतंय, याची चौकशी झाली पाहिजे.सीबीआयने कारवाई केल्यावर तुरूंगात गेलेला डिंपल चड्डा हा बांधकाम व्यावसायिक राज्य सरकारचे पैसे घेऊन परदेशात पळून गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवालही वडेट्टीवार यांनी केला आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना संघाच्या कार्यक्रमांना सहभागीहोण्याची परवानगी दिली आहे, त्यावर वडेट्टीवार म्हणाले की, संघाची लोकंआता फुलपँटवर आलेत. उद्या ते हाफपँट घालायला सांगतील, नाहीतर एक निर्णय घ्या सरकारी कर्मचाऱ्यांना आता हाफपँटवर यायला सांगा, असा खोचक टोला लगावत त्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका केली.
संबंधित बातम्या