Uddhav Thackeray: दोन ठग महाराष्ट्र लुटत आहेत; त्यांना खांदा देण्याची वेळ आलीय, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray: दोन ठग महाराष्ट्र लुटत आहेत; त्यांना खांदा देण्याची वेळ आलीय, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

Uddhav Thackeray: दोन ठग महाराष्ट्र लुटत आहेत; त्यांना खांदा देण्याची वेळ आलीय, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

Updated Oct 08, 2024 06:01 PM IST

Uddhav Thackeray : छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली होती स्वराज्यासाठी... हेदोन ठग माझा महाराष्ट्र लूटत आहेत. शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र लूटत आहेत. तोच लुटीचा पैसा वापरून जाहिराती करत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी मोदी-शहांवर केली आहे.

उद्धव ठाकरेंची मोदी-शहांवर टीका
उद्धव ठाकरेंची मोदी-शहांवर टीका

याआधी मराठी वगुजराती असा वाद कधीच नव्हता. यापुढेही तो होऊ नये अशी आमची इच्छा आहे. पण दोन गुजराती ठग तिकडे बसले आहेत. त्यांनी मुंबईतच नव्हे तर गुजरात आणि देश अशी भिंत तयार केली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सुरत लुटली होती. आता हे दोन ठग छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र लुटत आहेत, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर केली. मुंबईत दादर येथील शिवाजी मंदिर येथे राज्यव्यापी वज्र निर्धार परिषदेत बोलताना त्यांनी भाजप व मोदीवर जोरदार निशाणा साधला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, यांचे हिंदुत्व बोगस आहे. त्यांच्याकडून संविधान बदलण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे मी माझ्या भाषणाची सुरुवात देशभक्तांनो, अशी केली. त्यावर टीका करण्यात आली. देशभक्त म्हटल्यानंतर त्यात हिंदू ,मुस्लीम, सर्वजण येतात.सरकारकडूनयोजनांचा पाऊस पाडला जात आहे, मात्र अंमलबजावणीचा दुष्काळ आहे. सरकार स्थापन करताना ५० खोके घेतले. गद्दारांना ५० खोके आणि बहिणीला फक्त १५०० रुपये. छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली होती स्वराज्यासाठी... हेदोन ठग माझा महाराष्ट्र लूटत आहेत. शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र लूटत आहेत. तोच लुटीचा पैसा वापरून जाहिराती करत आहेत. हा आमचा महाराष्ट्र धर्म नाही.

ते आमचंच पाप-

उद्धव ठाकरे म्हणाले, नवा महाराष्ट्र घडवण्याची गरज नाही,जे आहे ते टिकवलं तर महाराष्ट्र इतरांच्या खूप पुढे आहे. मग ते कोणतेही क्षेत्र घ्या.. सर्वात महाराष्ट्र अन्य राज्यांच्या पुढे आहे. काय म्हणून त्या दोघांचं ऐकायचं. दुर्देवं म्हणून तुम्ही तिकडे बसलात, ते आमचेच पाप आहे. तुम्हाला आम्हीच आधार दिला. तुम्ही आहात कोण? लोकशाही का संपवायची आहे? लोकशाही संपवण्याची भाषा करतात. तुम्ही कोणी नव्हता तेव्हा आम्ही तुम्हाला खांदा दिला. खांद्याचे दोन अर्थ होतात. आताही वाटतं तुम्हाला खांदा द्यावा. जनता वाट बघत आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्याचे नाव जाहीर करावे -

महाआघाडीतील मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाष्य केले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीआधीच मुख्यमंत्र्याचे नाव जाहीर करावे,कोणत्याही नावाला माझा पाठिंबा असेल. पुन्हा येईन असे मला कधी वाटलेच नाही. मात्र दोन ठगांच्य गुलामगिरीला आम्ही स्वीकारणार नाही. हिंदुत्व हे हिंदुत्व आहे. पण काळानुसार भूमिका घ्यावी लागते. मला शेंडी जानवे आणि घंटा बडवणारे हिंदुत्व नको, हे माझे वाक्य नाही तर बाळासाहेबांचे आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या