ठाण्यातील कापूरबावडी परिसरात थरकाप उडवणारी घटना; सेक्युरिटी सुपरवायजरची मुंडकं छाटून निर्घृण हत्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ठाण्यातील कापूरबावडी परिसरात थरकाप उडवणारी घटना; सेक्युरिटी सुपरवायजरची मुंडकं छाटून निर्घृण हत्या

ठाण्यातील कापूरबावडी परिसरात थरकाप उडवणारी घटना; सेक्युरिटी सुपरवायजरची मुंडकं छाटून निर्घृण हत्या

Updated Sep 16, 2024 02:40 PM IST

thane kapurbawdi brutal murder : ठाण्यातील एका कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये सेक्युरिटी सुपरवायजरची मुंडकं छाटून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यामुळं परिसरात खळबळ उडाली आहे.

ठाण्यात थरकाप उडवणारी घटना; सेक्युरिटी सुपरवायजरची मुंडकं छाटून निर्घृण हत्या
ठाण्यात थरकाप उडवणारी घटना; सेक्युरिटी सुपरवायजरची मुंडकं छाटून निर्घृण हत्या

Thane Kapurbawdi murder : ठाण्यातील कापूरबावडी परिसरात थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. येथील कोलशेत रोडवर असलेल्या एका उच्चभ्रू सोसायटीत सुरक्षा पर्यवेक्षकाची (Security Supervisor) मुंडकं छाटून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

ही घटना आजच घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, येथील एका कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या इमारतीच्या टेरेसवर डोकं कापलेल्या अवस्थेत सेक्युरिटी सुपरवायजरचा मृतदेह आढळून आला. कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि ठाणे गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले असून, तपास सुरू आहे.

पोलिसांचा प्राथमिक कयास काय?

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. आर्थिक वादातून हा खून झाला असावा असा पोलिसांचा कयास आहे. आरोपी सुरक्षा रक्षकांपैकीच एखादा असावा, असाही अंदाज बांधला जात आहे.

रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण 

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोसायटीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मेसेज फिरू लागल्यानंतर आम्हाला या संदर्भात माहिती मिळाली. या घटनेमुळं सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

अंबरनाथमध्ये मजुरानं केला कंत्राटदाराचा खून

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये आणखी एका खुनाची घटना घडली आहे. या प्रकरणात एका २३ वर्षीय मजुरानं त्याच्या मालकाचा खून केला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, सलीम याकुब शेख असं आरोपीचं नाव आहे. त्यानं रविवारी कामगार कंत्राटदार अब्दुल रहमान (५२) यांचा खून केला. रोजची मजुरी १ हजार रुपयांवरून ७०० रुपयांपर्यंत कमी केल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. त्याच रागातून हा खून झाला, असं अंबरनाथ पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यानं सांगितलं.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर