राज्यात मंगळवारी दुपारपर्यंत १० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, त्यामुळे राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ही २३० वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार मुंबईत ५, पुण्यात ३ आणि बुलढाण्यात २ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
विस्थापित कामगारांच्या व्यवस्थेसाठी राज्य सरकारकडून ४५ कोटींचा निधी
सोमवारी राज्यात १७ नविन रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे सोमवार दिवसाअखेरपर्यंत हा आकडा २२० होता . या १७ नवीन रुग्णांमध्ये ८ रुग्ण मुंबईचे असून ५ रुग्ण पुण्याचे, २ नागपूरचे तर नाशिक आणि कोल्हापूर येथील प्रत्येकी १ रुग्ण होता. तर सोमवारी राज्यात २ कोरोनाबाधित रुग्णाचे मृत्यू झाले होते. एकाचा मुंबईत तर दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू हा पुण्यात झाला होता.
5 fresh Coronavirus cases (1-Mumbai, 2-Pune and 2- Buldhana) in Maharashtra; Total number of positive cases in the state rises to 225: Maharashtra Health Department
— ANI (@ANI) March 31, 2020
राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही दहा आहे. तर सोमवारपर्यंत ३९ कोरोना बाधित रुग्णांना घरी सोडण्यात आलं अशी माहितीही आरोग्य मंत्रालयानं दिली.
दिल्लीत धार्मिक कार्यक्रमात आलेल्या ६ जणांचा कोरोनाने मृत्यू