पुण्यात दहावी, बारावी परीक्षेदरम्यान परीक्षा हॉलमध्ये पाण्याची बॉटल नेण्यास परवानगी, जीबीएसमुळे राज्य मंडळाचा निर्णय
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यात दहावी, बारावी परीक्षेदरम्यान परीक्षा हॉलमध्ये पाण्याची बॉटल नेण्यास परवानगी, जीबीएसमुळे राज्य मंडळाचा निर्णय

पुण्यात दहावी, बारावी परीक्षेदरम्यान परीक्षा हॉलमध्ये पाण्याची बॉटल नेण्यास परवानगी, जीबीएसमुळे राज्य मंडळाचा निर्णय

Published Feb 07, 2025 12:52 PM IST

HSC And SSC exam : पुण्यात पुढील आठवड्यात राज्य महामंडळाच्या बारावी आणि दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. या परीक्षेत मुलांना वर्गात पाणी बॉटल नेण्याची परवानगी देण्यात आली आहे.

पुण्यात दहावी, बारावी परीक्षेदरम्यान परीक्षा हॉलमध्ये पाण्याची बॉटल नेन्यास परवानगी, जीबीएसमुळे राज्य मंडळाचा निर्णय
पुण्यात दहावी, बारावी परीक्षेदरम्यान परीक्षा हॉलमध्ये पाण्याची बॉटल नेन्यास परवानगी, जीबीएसमुळे राज्य मंडळाचा निर्णय

HSC And SSC exam : राज्यात पुढील आठवडण्यात राज्य मंडळाच्या परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षे दरम्यान, विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये त्यांच्या पाण्याच्या बाटल्या हॉलमध्ये घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुण्यात जीबीएसच्या वाढत्या रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर, राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांनी फक्त पुण्यासाठी ही परवानगी दिली आहे. या बॉटल विद्यार्थ्यांना वर्गात पर्यवेक्षकाने नियुक्त केलेल्या ठिकाणी ठेवाव्या लागणार आहेत.

पुण्यात जीबीएस आजाराने थैमान घातले आहेत. पुण्यात या आजारामुळे ६ जनांचा मृत्यू झाला आहे. तर रुग्णसंख्या १७३ वर पोहोचली आहे. यामुळे चिंतेचे वातावरण आहे. त्यात पुढील आठवड्यात बारावी आणि दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. जीबीएस आजार दूषित पाण्यामुळे पसरत असल्याचे निष्पन्न झाल्याने पुण्यातील परीक्षा देणाऱ्या मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. परीक्षा काळात पाण्याची बॉटल परीक्षा हॉलमध्ये नेन्यास परवानगी नसते. मात्र, पुण्यापुरता हा नियम शिथिल करण्यात आला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान, मुलांना वर्गात त्यांनी घरून आणलेल्या पाण्याच्या बॉटल नेन्यास परवानगी देण्यात आली आहे.

या बाबत राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोस्वामी म्हणाले, "सहसा, आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या बाटल्या वर्गात घेऊन जाण्याची परवानगी देत ​​नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शाळेने आधीच केलेली असते. परीक्षेदरम्यान मुलांना तहान लागल्यावर त्यांना नेमून देण्यात आलेल्या मुलांमार्फत पाणी दिले जाते. मात्र, पुण्यात वाढत्या जीबीएस रुग्णसंख्येमुळे आम्ही तसेच पालक व विद्यार्थी धोका पत्करू इच्छित नाहीत. त्यामुळे त्यांनी घरून पाणी घेऊन यावे. हा नियम आम्ही पुण्यापुरता शिथिल केला आहे.

बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. गुरुवारी, राज्य मंडळाने ग्रेस मार्कसाठी एक परिपत्रक देखील जारी केले. त्यात म्हटले आहे की, सरकारी नियमांनुसार, फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये एसएससी आणि एचएससीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी-खेळाडू आणि एनसीसी आणि स्काउट/गाईडमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त बोनस गुण दिले जाणार आहेत.

Ninad Vijayrao Deshmukh

TwittereMail

निनाद देशमुख हिंदुस्तान टाइम्स-मराठीमध्ये सीनिअर कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून २०२२ पासून कार्यरत आहे. निनादने पुणे विद्यापीठातून एमए (जर्नलिझम) शिक्षण घेतले आहे. पुण्यातील केसरी वृत्तपत्रातून २००७ मध्ये बातमीदार म्हणून करियरची सुरूवात. २००९ ते २०२२ पर्यंत लोकमत, पुणे येथे वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केले. निनादला डिफेन्स, सायन्स, अंतराळ विज्ञान, आंतरराष्ट्रीय राजकारण विषयांची विशेष आवड आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर