Shalimar express : नागपूरमध्ये शालिमार एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले, रेल्वे सेवा विस्कळीत
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shalimar express : नागपूरमध्ये शालिमार एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले, रेल्वे सेवा विस्कळीत

Shalimar express : नागपूरमध्ये शालिमार एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले, रेल्वे सेवा विस्कळीत

Updated Oct 22, 2024 07:37 PM IST

Shalimar Kurla Express Derailed : नागपूरजवळ शालिमार-कुर्ला शालिमार एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली झाली. वारंवार होणाऱ्या अपघातांच्या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शालिमार एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले
शालिमार एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले

Shalimar Kurla Express Derailed : दिवाळीनिमित्त चाकरमानी आपआपल्या गावाकडे परतत असल्याने रेल्वेमध्ये गर्दी होत आहे. अशातच रेल्वे अपघाताची बातमी समोर आली आहे. नागपूरजवळ शालिमार-कुर्ला शालिमार एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. देशात वारंवार रेल्वे अपघाताच्या घटना समोर येत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

त्यानंतर नागपूरमध्ये एक्स्प्रेसचा डबे घसरल्याची घटना घडली आहे. शालिमार एक्स्प्रेसचे एस टू आणि पार्सलचे दोन डबे ट्रॅकवरून खाली उतरले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, शालिमार एक्स्प्रेसचे एस २ आणि पार्सलचे दोन डबे रुळावरून खाली उतरले आहेत. कुर्ला- शालिमार एक्स्प्रेस नागपुरातून जात असताना कळमना भागातून काही अंतरावर अचानक रेल्वेचे दोन डबे रुळावरून खाली उतरले. यात एस टू आणि पार्सलचा एक डबा आहे. शालीमार एक्सप्रेसचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. 

क्रेनच्या सहाय्याने रेल्वे पुन्हा रुळावर आणण्यात येत आहे. यासाठी युद्ध पातळीवर रेल्वे प्रशासनाकडून काम सुरू आहे. या मार्गावरील काही गाड्यांची सेवा प्रभावित झाली असून अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी टिटवाळा-सीएसएमटी लोकल ट्रेनचा शेवटचा डबा रुळावरून घसरल्याची घटना घडली होती. यावेळी लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती. लोक लोकलमधून उतरून चालत कल्याण स्थानकात गेले होते व तेथून दुसरी लोकल पकडून आपल्या गंतव्य स्थानी गेले होते.  

गेल्या काही दिवसांपासून रेल्वे अपघाताच्या तसेच मुंबईत लोकलचे डबे ट्रॅकवरून घसरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रेल्वेच्या वाढत्या अपघातांमुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या दोन्ही घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र, रेल्वेचे डबे रुळावरून घसरू नयेत, यासाठी रेल्वे प्रशासनाने दक्षता घेतली पाहिजे, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेकडून केली जात आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर