Raigad accident : भरधाव दुचाकीचा भीषण अपघात; ३ तरुण जागीच ठार
Raigad accident : रायगड जिल्ह्यात वाकण-पाली रस्त्यावरएक भीषण अपघात झाला आहे. भरधावमोटर सायकलच्या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
Road Accident: रायगड जिल्ह्यात वाकण-पाली रस्त्यावरएक भीषण अपघात झाला आहे. भरधाव मोटर सायकलच्या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,वाकण पाली मार्गावर भरधाव वेगात जाणाऱ्या मोटारसायकलचा अपघात झाला. तीन तरुण ट्रिपल सीट प्रवास करताना हा भीषण अपघातात झाला. यात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ओमकार देशमुख (वय २०,रा. सुधागड), ऋषिकेश लोखंडे (वय २४, रा. कल्याण) आणि यश चव्हाण (वय २१ रा. पालघर) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
तीनही मृत तरुण एकाच मोटारसायकलीवरून ट्रीपल सीटने प्रवास करत होते. भरधाव वेगात असलेली दुचाकी वजरोली गाव हद्दीतील जंगली पीर दर्ग्याजवळ आली असता अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि मोटारसायकल रस्त्याकडेला असणाऱ्या लोखंडी रेलिंगला ध़डकली. यात तीनही तरुणांना जीव गमवावा लागला.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
विभाग