Viral Video : कोल्हापुरातील शेतकऱ्याच्या घरी राहुल गांधी यांनी बनवली भाजी, गप्पा मारत घेतलं जेवण, पाहा!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral Video : कोल्हापुरातील शेतकऱ्याच्या घरी राहुल गांधी यांनी बनवली भाजी, गप्पा मारत घेतलं जेवण, पाहा!

Viral Video : कोल्हापुरातील शेतकऱ्याच्या घरी राहुल गांधी यांनी बनवली भाजी, गप्पा मारत घेतलं जेवण, पाहा!

Updated Oct 08, 2024 12:18 PM IST

Rahul Gandhi Viral Video: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोल्हापूर दौऱ्यात शेतकऱ्याच्या घरात जेवल्याचा व्हिडिओ समोर आला.

 व्हायरल व्हिडिओ : राहुल गांधींचा व्हिडिओ व्हायरल
व्हायरल व्हिडिओ : राहुल गांधींचा व्हिडिओ व्हायरल (AICC)

Rahul Gandhi News: काँग्रसचे नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर पोहोचताच त्यांनी कुठल्याही हॉटेलवर न जाता शहरालगतच्या उचगावातील एका टेम्पो चालकाच्या घरी भेट दिली. तिथे त्यांच्यासोबत घरगुती जेवणाचा आस्वाद घेतला. राहुल गांधींनी गरीब कुटुंबाची भेट घेतल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

राहुल गांधी आज सकाळी कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले. यानंतर ते कुठल्याही हॉटेलला न जाता त्यांनी उचगावमधील एख कौलारू घर गाठले. उचगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील अजित तुकाराम संधे यांच्या घरी राहुल गांधींनी भेट दिली. जवळपास अर्धातास राहुल गांधींनी संधे कुटुंबाशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधींनी संधे यांच्या घरात वांग्याची भाजी आणि कांद्याची पात खाल्ली. राहुल गांधी अचानक घरी आल्याचे पाहून संपूर्ण संधे कुटुंब भारावून गेले. एका वृत्त वाहिनीशी बोलताना संधे कुटुंबाने आपली प्रतिक्रिया दिली.

राहुल गांधींची भाजपवर घणाघाती टीका

राहुल गांधी यांनी कोल्हापूरमधील आपल्या भाषणात भाजपवर जोरदार टीका केली. ‘आपली लढाई संविधान वाचवण्याची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा. ⁠मी शिक्षण घेत असताना अस्पृश्यतेसंदर्भात अनेक पुस्तके वाचायला मिळाली. दलित आणि मागासवर्गीय यांचा इतिहास आता पुसून टाकला जात आहे’, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

संविधान वाचवण्यासाठी लढले पाहिजे

‘भारतीय संविधान हे शिवाजी महाराजांच्या विचाराचे प्रतिक आहे. मात्र, देशातील एक विचारधारा हे संविधान संपवण्याचे प्रयत्न करत आहे. हे संविधान वाचवण्यासाठी आपण लढा दिला पाहिजे. तर, आपण छत्रपती शिवरायांच्या विचारांच पाईक ठरु’, असे राहुल गांधी यानी म्हटले.

आरक्षणाबाबत काय म्हणाले?

आरक्षणाची ५० टक्के मर्यादा हटवावी आणि कोणतीही शक्ती त्याला रोखू शकणार नाही, याची खात्री आम्ही लोकसभा आणि राज्यसभेत करू. राज्यघटनेच्या रक्षणासाठी ही ५० टक्के मर्यादा हटविणे आवश्यक आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. दोन डझनहून अधिक विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष जातीनिहाय जनगणनेसाठी कायदे आणतील, असे राहुल गांधी यांनी संविधान सन्मान परिषदेत सांगितले.

राहुल गांधी महिनाभरात दुसऱ्यांदा पश्चिम महाराष्ट्रात

महिनाभरात राहुल गांधी यांचा पश्चिम महाराष्ट्राचा हा दुसरा दौरा आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी ते गेल्या महिन्यात सांगलीत आले होते. २०१४ आणि २०१९ मध्ये पराभूत झाल्यानंतर त्यांच्या पक्षाने अनुक्रमे कोल्हापूर आणि सांगली लोकसभेच्या जागा शिवसेना आणि भाजपकडून हिसकावून घेतल्या.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर