पोलीस दलात मोठी भरती प्रक्रिया सुरू आहे. मात्र राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने भरतीवर परिणाम झाला आहे. मुसळधार पावसाचा फटका पोलीस भरतीला बसताना दिसत आहे. मुसळधार पावसामुळे नांदेड आणि अमरावती ग्रामीण पोलीस भरती रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर आता गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. राज्यातील ज्या भागात किंवा जिल्ह्यात पाऊस सुरू आहे, तिथली पोलीस भरती स्थगित करण्यात आली असून येथील पोलीस भरती पुन्हा राबवण्यात येणार आहे, असे गृहमंत्री देवेंद्र फडवीस यांनी म्हटले आहे.
राज्यात १७ हजार ४७१ पोलिसांची रिक्क पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ही भरती प्रक्रिया १९ जूनपासून सुरुवात झाली आहे. मात्र राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु असल्याने पोलीस भरती प्रक्रियेवर परिणाम होत आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात ज्या-ज्या ठिकाणी पाऊस सुरू आहे. तेथील पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. पाऊस असलेल्या ठिकाणी मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यापुढेही पावसाचे दिवस आहेत. त्यानंतर पुढे आचारसंहिता सुरु होईल. अशावेळी पोलीस भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर घेण्याचा सरकारचा प्रयत्न राहील. कारण वयोमर्यादेमुळे अनेक उमेदवारांसाठी ही शेवटची संधी असते. त्यांना ती संधी मिळायला हवी.
'इफेक्टिव्ह आणि इफिशियंट कामासाठी एक प्रकल्प तयार करत आहोत. यात एक कंपनी सरकारने तयार केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कायदा आणि सुव्यवस्थेकरिता करता येणार आहे. त्याचे मॉड्युल तयार केले होते, त्याचे सादरीकरण आज झाले. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित केला जाईल.
देवेंद्र फडणवीस यांनी आजइफेक्टिव्ह आणि इफिशियंट कामासाठी राज्यातील गृहविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यामध्ये एका प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. सरकारकडून एक कंपनी तयार केली असून ती आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच गुन्हा झाल्यास तो सोडवण्यासाठी करणार आहे. त्याचे मॉड्युल तयार केले होते. त्याचे सादरीकरण आज झाले. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
या प्रकल्पामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीची माहिती काढणे, सीसीटीव्ही तपासणी, नंबर प्लेट ओळखणारा कॅमेरा नसला तरी याच्या माध्यमातून संबंधित वाहन व वाहनचालक शोधू शकतो. काही महिन्याच्या कामाचा निपटारा काही मिनिटात होईल. याचा वाहतूक नियोजनात फायदा होईल. या प्रकारचे मॉड्युल तयार करून सर्व युनिट्स इंटिग्रेड करणे सोपे होईल. आपण सर्वात आधुनिक सायबर केंद्र तयार केले आहे. लवकरच ते कार्यान्वित होईल. त्यामुळे देशात सर्वात सशक्त पोलीस दल आपलं असेल, अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
संबंधित बातम्या