Panshet dam : पुण्यातील वरसगाव धरण तुडुंब; पानशेतमधून पाणी सोडले, गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Panshet dam : पुण्यातील वरसगाव धरण तुडुंब; पानशेतमधून पाणी सोडले, गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

Panshet dam : पुण्यातील वरसगाव धरण तुडुंब; पानशेतमधून पाणी सोडले, गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

Updated Jul 29, 2024 08:57 AM IST

Pune Panshet Dam : पुण्यातील खडकवासला धरण साखळीतील महत्वाचे असलेले पानशेत धरण भरले असून वरसगाव धरणही भरण्याच्या मार्गावर आहे. पाटबंधारे विभागाने पानशेतमधून पाणी सोडण्यास सुरूवात केली आहे.

पानशेत धरण ओव्हर फ्लो! वरसगाही भरण्याच्या मार्गावर, पाणी सोडले, पाठबंधारे विभागाचा सतर्कतेचा इशारा
पानशेत धरण ओव्हर फ्लो! वरसगाही भरण्याच्या मार्गावर, पाणी सोडले, पाठबंधारे विभागाचा सतर्कतेचा इशारा

Pune Panshet Dam : पुण्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी घाट विभागात आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. सतत होणाऱ्या पावसामुळे पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत पाणी साठा वाढला आहे. टेमघर, वरसगाव, पानशेत व खडकवासला या चार धरणांमध्ये २४.९५ टीएमसी पाणीसाठा झाला. पानशेत धरण पूर्ण भरले आहे. तर वरसगाव धरण देखील भरण्याच्या मार्गावर आहे. यमुळे पानशेत धरणाच्या सांडव्यावरून होणारा विसर्ग वाढवून पहाटे ४.०० वाजता १५ हजार १३६ क्यूसेक करण्यात आला आहे.  खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात होणार विसर्ग सोमवारी सकाळी ९.०० वाजता वाढवून २२ हजार ८८० क्यूसेक करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. व नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास त्यांना तात्काळ हलवावे असे आवाहन मुठा कालवा पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांनी केले आहे.

खडकवासला धरण साखळी परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. या ठिकाणी अतिपर्जन्य झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे चारही धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून ही धरणे भरली आहे. त्यामुळे पुणे शहराची पाण्याची चिंता मिटली आहे. खडकवासला धरण साखळीची पाणीसाठवण्याची क्षमता ही २९ टीएमसी आहे. सध्या या साखळीत २४.९५ टीएमसी साठा झाला झाला आहे.

रविवारी पानशेत धरण ९४ टक्के क्षमेतेने भरले होते. त्यामुळे धरणातून कधीही पाणी सोडण्यात येईल असा इशारा पाटबंधारे खात्याने दिला होता. त्यानुसार आज सकाळ पासून १५ हजार क्युसेकने धरणात पाणी सोडण्यात येत आहे. ही पाणी खडकवासला धरणात येत असल्याने या धरणातून देखील विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे मुठा नदीपात्र ओसंडून वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरण परिसरात कोणीही उतरू नये व नदी मधील शेती पंप , नदी काठची शेती अवजारे, व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

खडकवासला धरणात १.६१ टीएमसी म्हणजे ८१.४३ टक्के, तर पानशेत धरणात १०.१६ टीमसी म्हणजेच ९५.४५ टक्के पाणी साठा झाला आहे. तर वरसगाव धरणात १०.२९ टीएमसी म्हणजेच ८०.२५ टक्के पाणी साठा झाला आहे. तर टेमघर धरणात २.८९ टीएमसी म्हणजेच ७७,९९ टक्के पाणी साठा झाला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर