'लोकं खूप हुशार.. घराघरांपर्यंत सावजी मटण पोहोचवलं, तरीही आम्ही हारलो...', नितीन गडकरींनी सांगितला ‘तो’ किस्सा
Nitin Gadkari : एकानिवडणूक प्रचाराचा किस्सा सांगताना, नितीन गडकरी म्हणाले की, आपण घरोघरी मटण वाटूनही निवडणूक हरलो होतो.
केंद्रीय मंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी खूप प्रसिद्ध आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी म्हटले होते की, तुम्हाला लक्ष्मीचे दर्शन होईल, जे देतात ते घ्या मात्र मतदान भाजपलाच करा. गडकरींच्या विधानावरून तेव्हा वाद झाला होता. आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात असाच एक भन्नाट किस्सा सांगितला.
ट्रेंडिंग न्यूज
एका निवडणूक प्रचाराचा किस्सा सांगताना, नितीन गडकरी म्हणाले की, आपण घरोघरी मटण वाटूनही निवडणूक हरलो होतो. मतदार अत्यंत हुशार असतात. ते सर्वांनी दिलेला माल ठेऊन घेतात आणि ज्याला मत द्यायचे त्यालाच देतात, असे गडकरी म्हणाले.
नितीन गडकरी म्हणाले की, निवडणूक प्रचारात अनेक फंडे अंवलंबले जातात. पोस्टर्स लावून, कार्यकर्ते व मतदारांना जेवणावळ्या देऊन निवडणुका जिंकल्या जातात, यावर माझा विश्वास नाही. मी अनेक निवडणुका लढवल्या आहेत. मी सर्व प्रयोग करून बघितले आहेत. एकदा निवडणुकीत तर एक-एक किलो सावजीचे मटण घराघरात पोहोचवण्याचेही काम झाले. पण आम्ही निवडणूक हरलो.
गडकरी म्हणाले, लोक अत्यंत हुशार आहेत. ते म्हणतात, जे देत आहेत ते ठेवून घ्या. आपल्याच बापाचा माल आहे. मात्र मत त्यालाच देतात. ज्यांना त्यांना द्यायचे आहे. त्यामुळे, जेव्हा आपण आपल्या लोकांमध्ये विश्वास निर्माण करता, तेव्हाच ते आपल्यावर विश्वास ठेवतात. त्याला कुठल्याही पोस्टर बॅनरची आवश्यकता लागत नाही. अशा मतदारांना, कुठल्याही प्रकारची आमिषं दाखविण्याची आवश्यकता नसते. कारण त्याला आपल्यावर विश्वास असतो आणि हा लाँग टर्न आहे, याला कुठलाही शॉर्टकट नाही.
विभाग