Sangamner Suicide : अहमदनगर हादरले! लग्नानंतर चार महिन्यांतच नवदाम्पत्यानं संपवलं आयुष्य; झाडाला घेतला गळफास, कारण काय?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sangamner Suicide : अहमदनगर हादरले! लग्नानंतर चार महिन्यांतच नवदाम्पत्यानं संपवलं आयुष्य; झाडाला घेतला गळफास, कारण काय?

Sangamner Suicide : अहमदनगर हादरले! लग्नानंतर चार महिन्यांतच नवदाम्पत्यानं संपवलं आयुष्य; झाडाला घेतला गळफास, कारण काय?

Aug 12, 2024 02:20 PM IST

sangamner couple suicide : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील साकुर गावात धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या तीन महिन्यातच एका नव दाम्पत्याने टोकाचा निर्णय घेत जीवन संपवलं आहे.

अहमदनगर हादरले! लग्नाच्या तीन महिन्यानंतर नवदाम्पत्यानं संपवलं आयुष्य; झाडाला घेतला गळफास
अहमदनगर हादरले! लग्नाच्या तीन महिन्यानंतर नवदाम्पत्यानं संपवलं आयुष्य; झाडाला घेतला गळफास

sangamner couple suicide : अहमदनगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहित दाम्पत्याने टोकाचं पाऊल उचलतं गावात झाडाला गळफास घेऊन त्यांचं जीवन संपवलं आहे. त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण पुढे येऊ शकले नाही. पण, या प्रकारामुळे संपूर्ण गाव हदारलं आहे.

वैभव आमले (वय २२) आणि स्नेहा आमले (वय २०) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. त्यांचे तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. रविवारी संध्याकाळी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यांनी मुळा नदी जवळील मांगमळीत एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, वैभव व स्नेहा आमले यांचे तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. हे दोघेही पुण्यात नोकरी करत होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच दोघेही संगमनेरमधील त्यांचे मूळ गाव असलेले साकोरे येथे परत आले होते. रविवारी संध्याकाळी त्यांनी मुळा नदीच्या मांगमळी येथे एका झाडाला गळफास घेतला.

दरम्यान, येथून जाणाऱ्या काही ग्रामस्थांना त्यांचे झाडाला लटकलेले मृतदेह दिसले. ग्रामस्थांनी याची माहिती ही घारगाव पोलिसांना दिली. घारगाव पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट आढळली नाही. पोलिसांनी आमले दाम्पत्याने आत्महत्या का केली, याचा तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे साकुर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

फर्ग्युसन रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा

फर्ग्युसन रस्त्यावर फेरीवाल्यांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. उज्वला जितेंद्र गौड, शरयू परब, हेमंत दत्ता गायकवाड, राज निल, मुन्ना विठ्ठल गायकवाड, साक्षी गौड व काही कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक अनुराधा मुळीक यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. शहरात फर्ग्युसन रस्त्यावर रात्रीच्या वेळी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे. असे असतांना वाडेश्वर हाॅटेलजवळ बेकायदा फेरीवाल्यांविरुद्ध भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली व नागरिकांची गैरसोय झाली. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर