Mumbai-Nashik highway Accident News: मुंबई- नाशिक महामार्गावर आज (१५ जानेवारी २०२५) पहाटे पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यातील आठ जणांची प्रकृती चिंतानजक आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मुंबई- नाशिक महामार्गावर शहापूर येथे आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास कंटेनर, ट्रक आणि खाजगी बससह पाच वाहने एकमेकांना धडकली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील ८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक महामार्गावर शहापूरातील गोठेघरजवळ हा भीषण अपघात घडला. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु, मालवाहतूक ट्रकला पाठीमागून येणाऱ्या चार वाहनांनी धडक दिली, असे सांगण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. हा अपघातात पाचही वाहनाचे नुकसान झाले आहे.
संबंधित बातम्या