Mumbai Local train : वडाळा येथे रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं हार्बर मार्गावरील लोकल उशिराने सुरू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Local train : वडाळा येथे रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं हार्बर मार्गावरील लोकल उशिराने सुरू

Mumbai Local train : वडाळा येथे रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं हार्बर मार्गावरील लोकल उशिराने सुरू

Updated Jul 09, 2024 10:58 AM IST

Mumbai Rain: वडाळा रेल्वे स्थानकाच्या रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने हार्बर मार्गावरील गाड्या उशिराने धावत आहेत.

 वडाळा रेल्वे स्थानकावर रेल्वे रुळात पाणी साचले, हार्बल मार्गावरील गाड्या उशीराने
वडाळा रेल्वे स्थानकावर रेल्वे रुळात पाणी साचले, हार्बल मार्गावरील गाड्या उशीराने

Mumbai Waterlogging: सोमवारी (०८ जुलै २०२४) दिवसभर मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेसह लोकल गाड्यांच्या तिन्ही मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. सकाळच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतल्यामुळे लोकस सेवा सुरळीत झाल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले. मात्र, वडाळा रेल्वे स्थानकाच्या रेल्वे रुळांवर पाणी साचले असून हार्बर मार्गावरील गाड्या अजूनही उशीराने धावत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने मध्य रेल्वेच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे वडाळा स्टेशनवर रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. परिणामी, हार्बर मार्गावरील सेवा काही मिनिटे उशिराने धावत आहेत. एएनआय आपल्या ट्विटमध्ये वडाळा स्थानकाच्या रेल्वे रुळावर पाणी साचल्याचा व्हिडिओही पोस्ट केला आहे. दरम्यान, “मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात मंगळवारी मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता प्रवाशांनी अपरिहार्यतेशिवाय प्रवास करणे टाळावे", असे आवाहन मध्य रेल्वेने प्रवाशांना केले.

मुंबई ठाणेसह पालघर जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई ठाणेसह पालघर जिल्ह्यात मंगळवारी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. तर, धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातही पावासाचा यलो अलर्ट जाही करण्यात आला.

शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

हवामान विभागाने मुंबईत आज (९ जुलै २०२४) मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवल्याने मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पावसळ्यात नागरिकांना कोणती काळजी घ्यावी?

  • नद्या आणि कालव्यांवरील पूरग्रस्त पूल ओलांडू नयेत.
  • पर्यटकांनी पाणवठे, धरणे, नदीकाठ, घाट टाळावेत.
  • विजेच्या वेळी भक्कम छताखाली आश्रय घ्या.
  • मुसळधार पावसात जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये आश्रय घेणे टाळा.
  • आपत्कालीन परिस्थिती शांतपणे हाताळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
  • मदतीसाठी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाशी १०७७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर