मुंबईत पोलिसांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात नागरिकांना आवाहन केले आहे. आज सकाळी ८.३० पर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यामुळे मुंबईकरांनी शक्यतोवर घराबाहेर पडू नये. अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. नागरिकांना आपात्कालीन परिस्थिती काही मदत हवी असल्यास १०० किंवा ११२ या क्रमांकवर फोन करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) सकाळी ८.३० वाजेपर्यंत 'रेड अलर्ट'चा अंदाज वर्तवला आहे. आयएमडीने आज दिवसभर मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा अंदाज वर्तवला आहे. मुसळधार पावसामुळे शहरात वाहतूक कोंडी, पाणी साचणे आणि सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.
मुंबई पोलिसांनी शुक्रवारी संपूर्ण शहरात मुसळधार पावसाचा इशारा दिला असला तरी मुंबईतील हवामान आणि पाऊस सामान्य असून आज शैक्षणिक संस्था व शाळा सुरू ठेवण्याचे आदेश बृहन्मुंबई महानगरपालिकेने गुरुवारी रात्री उशिरा जाहीर केले.
शाळा आणि महाविद्यालयांच्या सुट्ट्यांबाबत इतर कोणत्याही माहितीवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावे, अशी विनंती पालकांनी केली आहे. नागरिकांनी अधिक माहितीसाठी संबंधित शाळा व महाविद्यालयांच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
मुंबई उपनगरातील काही भागात गुरुवारी झालेल्या पावसामुळे सुमारे अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली तर १० विमानांचे मार्ग जवळच्या विमानतळावर वळविण्यात आले. रेल्वे रुळ आणि स्थानकांवर पाणी साचल्याने लोकल सेवा देखील उशिराने धावत आहे.
गुरुवारी सकाळी साडेआठवाजेपर्यंतच्या चोवीस तासांत मुंबई शहरात ४४ मिमी, पूर्व उपनगरात ९० मिमी आणि पश्चिम उपनगरात ८९ मिमी पावसाची नोंद झाली. रस्त्यांवर पाणी साचल्याने पावसाचे पाणी घरांमध्ये शिरले आणि रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली.
संबंधित बातम्या