Ganeshotsav : मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी गणेशोत्सवात बेस्ट बस सेवा रात्रभर सुरू राहणार, मेट्रोच्या फेऱ्या वाढणार!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ganeshotsav : मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी गणेशोत्सवात बेस्ट बस सेवा रात्रभर सुरू राहणार, मेट्रोच्या फेऱ्या वाढणार!

Ganeshotsav : मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी गणेशोत्सवात बेस्ट बस सेवा रात्रभर सुरू राहणार, मेट्रोच्या फेऱ्या वाढणार!

Updated Sep 06, 2024 09:09 AM IST

Metro and BEST Service: गणेशोत्सवात गणेशभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट म्हणजेच बेस्टने आपल्या वाहतुकीच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेशोत्सवात मुंबईत बेस्ट आणि मेट्रोच्या वाढीव फेऱ्या चालविणार
गणेशोत्सवात मुंबईत बेस्ट आणि मेट्रोच्या वाढीव फेऱ्या चालविणार (HT)

Mumbai Ganeshotsav News: महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट म्हणजेच बेस्ट या दोन सार्वजनिक परिवहन कंपन्यांनी गणेशोत्सवात भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी रात्री उशिरा आणि पहाटेपर्यंत आपली सेवा सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे..

७ सप्टेंबरपासून एमएमएमओसीएल १० दिवसांच्या फेस्टिव्हलदरम्यान मुंबई मेट्रो २ ए आणि ७ रेल्वे सेवा वाढवणार आहे. अंधेरी पश्चिम आणि गुंदवली टर्मिनलवरील शेवटची मेट्रो सेवा ११ ते १७ सप्टेंबर दरम्यान रात्री ११ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत वाढविण्यात येणार आहे.

'गणपती उत्सव हा मुंबईतील महत्त्वाचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. सर्व भाविक आणि नागरिकांना विनाअडथळा वाहतूक उपलब्ध करून देणे ही आमची जबाबदारी आहे. मेट्रो रेल्वे सेवेचा विस्तार करून सणासुदीच्या काळात प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत प्रवास करण्याचा कार्यक्षम आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध करून देत आहोत,' असे एमएमएमओसीएलचे अध्यक्ष डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.

कामकाजाची वेळ वाढविण्यात येणार असल्याने अंधेरी पश्चिम आणि गुंदवली मेट्रो स्थानकातून अतिरिक्त २० फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. गुंदवली ते दहिसर पूर्व स्थानकांदरम्यान आणि अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्व स्थानकांदरम्यान काही सेवा वाढविण्यात येणार आहेत.

एमएमएमओसीएलच्या व्यवस्थापकीय संचालिका रुबल अग्रवाल म्हणाल्या की, ‘अतिरिक्त सेवेमुळे केवळ गर्दी कमी होणार नाही. तर, सणासुदीच्या उपक्रमांमध्ये भाग घेऊन घरी परतणाऱ्यांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवास देखील सुनिश्चित होईल.’

त्याचप्रमाणे बेस्ट ७ ते १६ सप्टेंबर दरम्यान २४ रात्र विशेष बसेस चालवणार आहे. तसेच ७१ मिरवणुकीच्या मार्गावर दक्षिण मुंबई उजळून निघणार आहे. रात्री १०.३० ते सकाळी ६ या वेळेत ५१ मुख्य मार्गांना जोडणाऱ्या या विशेष बसेस धावणार आहेत. बस मार्ग क्रमांक ४, ए २१, ए २५, ए ४२, ४४, ८६ आणि ६९ चा समावेश आहे.

प्रवाशांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देत बेस्ट काही मार्गांवर नवीन बससेवा चालवणार आहे. लालबाग, परळ, चेंबूर आणि गिरगाव ला मुंबईच्या विविध भागांशी जोडण्याची योजना आहे, अशी माहिती बेस्टच्या अधिकाऱ्यांनी दिली. उत्सवाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दक्षिण मुंबईतील ७१ मिरवणूक मार्गांवर २,५९१ दिवे लावण्याची बेस्टची योजना आहे. २० विसर्जन स्थळे आणि ३९ कृत्रिम तलावांचाही या योजनेत समावेश करण्यात येणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर