Mumbai Woman Thrashing Children With Belt: मुंबईच्या गोरेगाव येथील पारसी कॉलनीमधून धक्कादायक घटना उघडकीस आली. एक महिला पोटच्या मुलीला पट्ट्याने मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. संबंधित महिलेच्या पतीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांनी मुंबई पोलीस, राज्य मानवी हक्क आयोग आणि राज्य बाल हक्क आयोगाला कारवाई करण्याची विनंती केली आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये ही महिला मुलांना बेल्टने मारहाण करताना आणि घाबरवताना दिसत आहे. मारहाणीपासून मुलांना वाचवण्यासाठी पतीने हस्तक्षेप का केला नाही? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. पीडित मुलगी घाबरल्याचे दिसत असून आईला नको मारू, अशी विनंती करत आहे. मात्र, तरीही महिला तिला बेल्टने मारहाण करताना दिसत आहे, असे या व्हिडिओ पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित नेटकऱ्यांनी व्हिडिओमध्ये मुलांना बेल्टने मारहाण करताना दिसणाऱ्या महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी संबंधित डीसीपींना कारवाई करण्यास सांगितले आहे. पोलिसांनी कुटुंबाचीही भेट घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोस्टा रिकामधील अॅडिस मिलर नुकताच २१ दिवसात १३ किलो वजन कमी करणाऱ्या तरुणाचा व्हायरल झाला. या वर्षाच्या सुरुवातीला मी कोस्टा रिकामध्ये २१ दिवसांचे जलउपोषण सुरू केले होते. हा अनुभव खरोखरच माझ्यासाठी आयुष्य बदलून टाकणारा होता आणि मी माझ्या प्रवासातील काही मौल्यवान क्षण सामायिक करण्यास उत्सुक आहे," असे आदिसने त्याच्या यूट्यूब व्हिडिओवर लिहिले आहे.
पौष्टिक कमतरता: अन्नाशिवाय विस्तारित कालावधीमुळे जीवनसत्त्वे, खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्स सारख्या आवश्यक पोषक द्रव्यांची कमतरता उद्भवू शकते, ज्यामुळे संभाव्यत: अशक्तपणा, चक्कर येणे किंवा आरोग्याच्या अधिक गंभीर समस्या उद्भवू शकतात.
डिहायड्रेशनचा धोका: हायड्रेशनसाठी पाणी आवश्यक आहे, परंतु इलेक्ट्रोलाइट संतुलन याशिवाय जास्त पाण्याचे सेवन केल्याने इलेक्ट्रोलाइट असंतुलन आणि डिहायड्रेशन होऊ शकते.
चयापचयावर परिणाम: दीर्घकाळ उपवास केल्याने चयापचय कमी होऊ शकते कारण शरीर उर्जा वाचविण्यासाठी समायोजित होते, संभाव्यत: उपवास संपल्यानंतर वजन वाढू शकते.
वैद्यकीय विचार: मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग किंवा खाण्याचे विकार यासारख्या विशिष्ट वैद्यकीय परिस्थिती असलेल्या व्यक्तींनी पाण्याचा उपवास टाळावा किंवा कठोर वैद्यकीय देखरेखीखालीच असे करावे.
संबंधित बातम्या