मुंबई प्रदेश काँग्रेस अंतर्गत पहिल्यांदाच तृतीयपंथीय सेलची स्थापना झाली. या सेलच्या अध्यक्षपदी सलमा उमरखान साखरकर यांची नियुक्ती करण्यात आली. या बाबतची बैठक प्रा.वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई काँग्रेस कार्यालयात पार पडली.
मुंबईतील तृतीयपंथींनी विविध समस्यांसाठी या आधी सातत्याने लढा दिला आहे. आता मुंबई काँग्रेसच्या माध्यमातून त्यांच्या विविध प्रश्नांना अधिक आक्रमकपणे वाचा फोडतील,असा विश्वास प्रा. वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला.
मुंबईत सत्तर हजार तृतीयपंथी आहेत तर संपूर्ण देशात ही संख्या पाच लाख आहे. दिवसेंदिवस अनेक समस्यांना तृतीयपंथींना सामोरे जावे लागते,त्या समस्या सोडवण्यासाठी आज काँग्रेस आपल्या परीने प्रयत्न करत आहे.
काँग्रेस प्रागतिक विचारांचा पक्ष आहे आणि त्या विचारांची पाठराखण करून आज या पदाची नियुक्ती करण्यात आली आहे. तृतीयपंथी समुदायाला आपली मते मांडण्यासाठी आणि आपले अडथळे दूर करण्यासाठी व्यासपीठ मिळेल, असे प्रा. वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
संबंधित बातम्या