Mumbai Airport news : मुंबई विमानतळ देशातील महत्वाचे विमानतळ आहे. येथून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण आणि लँडिंग होत असतं. मात्र, हे विमानतळ ९ मे रोजी ६ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने अनेक कामे करण्यात येणार असल्याने ही विमानतळ बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ अशा वेळेत विमानतळ बंद राहणार आहे.
मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. याचा परिमाण विमानगटाळच्या धावपट्टीवर देखील होतो. त्यामुळे या कालावधीमध्ये मुंबई विमानतळावरील विमान प्रवास व सर्व सुविधा सुरळीत आणि व्यवस्थित राहावे या साठी हे देखभाल दुरुस्तीचे काम केले जाते. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी ही कामे केली जात असतात. हे काम करण्याआधी या बाबतची माहिती ही सर्व विमान कंपन्यांना सहा महिन्या आधीच देण्यात येत असते.
या वर्षी देखील हे काम केले जाणार आहे. ९ मे रोजी ही कामे हाती घेण्यात येणार असल्याने ११ ते ५ या कालावधीमध्ये विमानसेवा तात्पुरती बंद राहणार आहे. त्यामुळे विमान कंपन्यांनी त्या अनुषंगाने आपल्या विमान उड्डाणांचे नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. ही कामे पूर्ण झाल्यावर सायंकाळी पाच नंतर विमानतळावरील सेवा पुन्हा सुरळीत होणार आहे. मुंबई विमानतळ हे १ हजार ३३ एकरावर बांधण्यात आले आहे.
विमानतळ ऑपरेटर एमआयएएल (मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड) ने विमानतळ बंद राहण्यासंदर्भात सोमवारी निवेदन काढले आहे. यात या बाबत माहिती देण्यात आली आहे.
मुंबई विमानगळ हे जगातील सर्वात व्यस्त विमानतळ आहे. येथून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण होत असते. हे विमानतळ भव्य आणि प्रशस्त आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने येथे मोठ्या प्रमाणात व्यावसायिक येत असतात.
संबंधित बातम्या