मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  VIDEO : राणा दाम्पत्याची १२ दिवसांनी भेट; पतीला पाहून नवनीत राणांना रडू अनावर..

VIDEO : राणा दाम्पत्याची १२ दिवसांनी भेट; पतीला पाहून नवनीत राणांना रडू अनावर..

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 05, 2022 07:27 PM IST

आज तब्बल १२ दिवसांनी राणा दामपत्याची तुरुंगातून सुटका झाली. या १२ दिवसात राणा दाम्पत्याची भेट झाली नव्हती. नवनीत राणा यांना भायखळा जेलमध्ये तर रवी राणा यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते. १२ दिवसांनी एकमेकांना पाहताच त्यांना रडू अनावर झाले. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

पतीला पाहूननवनीत राणांनारडू अनावर
पतीला पाहूननवनीत राणांनारडू अनावर

मुंबई – चिथावणीखोर भाषण करून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याच्या आरोपाखाली अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप लावण्यात आला होता. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टाने अखेर आज तब्बल १२ दिवसांनी राणा दामपत्याची सुटका केली.

या १२ दिवसात राणा दाम्पत्याची भेट झाली नव्हती. नवनीत राणा यांना भायखळा जेलमध्ये तर रवी राणा यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते. तेव्हा पासून राणा दाम्पत्याची भेट झाली नव्हती. कोर्टात सुनावणीच्या वेळी काही क्षण दोघांची भेट झाली होती. आज सकाळी भायखळा तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नवनीत राणा यांना लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नवनीत राणा यांच्या सुटकेनंतर तब्बल ५ ते ६ तासांनी रवी राणा यांची तळोजा तुरुंगातून सुटका झाली.

तळोजा तुरुंगातून सुटका होताच रवी राणा आपल्या पत्नीच्या भेटीला लीलावती रुग्णालयात पोहोचले.

नवनीत राणा यांना मणक्यासंबंधित त्रास असल्याने त्या वारंवार रुग्णालयात जाण्यासाठी तुरूंग प्रशासनाकडे विनंती करत होत्या. नवनीत राणा यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पती रवी राणा यांची भेट झाल्यानंतर नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले होते. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

१२ दिवसांनी राणा दाम्पत्याने पाहिले बाहरेचं जग -

नवनीत राणा व रवी राणा अखेर आज जेलबाहेर आले. १२ दिवसांनंतर नवनीत राणा यांनी जेल बाहेरचं जग पाहिलं आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांना काल म्हणजेच बुधवारी जामीन मंजूर झाला होता मात्र काही तांत्रिक बाबींमुळे राणा दाम्पत्य बुधवारी जेलमध्येच राहिलं होतं. आता मात्र सर्व तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यावर नवनीत राणा जेल बाहेर आल्या आहेत. गेले अनेक दिवस मान दुखत असल्याची तक्रार नवनीत राणा यांनी केली होती. त्यानुसार त्यांना आता वांद्र्याच्या लीलावती रुग्णालयात नेण्यात येणार आहे. जेलमधल्या जमिनीवर झोपावं लागल्यानं त्यांची मानदुखी बळावली होती. आता लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर संपूर्ण उपचार करण्यात येणार आहेत. मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणणार असा राणा दाम्पत्याचा हट्ट होता. ते प्रकरणही मुंबईत चांगलंच गाजलं होतं. त्यानंतर राणा दांम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करत त्यांना तुरुंगात जावं लागलं होतं.

त्यांच्या विरोधात पोलिसांनी भादंवि कलम १२४ अ नुसार राजद्रोह,राज्य सरकारविरोधात प्रक्षोभक विधाने करणे आणि सरकारला आव्हान देणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. अखेर बारा दिवसांनी जामीन मिळाल्यानंतर राणा दाम्पत्य तुरुंगातून बाहेर आलं आहे.

IPL_Entry_Point

विभाग