मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MNS Protest : पुण्यात मनसे कार्यकर्ते आक्रमक; वंदे मातरमच्या घोषणा.. पाकिस्तानचा झेंडा जाळला! VIDEO

MNS Protest : पुण्यात मनसे कार्यकर्ते आक्रमक; वंदे मातरमच्या घोषणा.. पाकिस्तानचा झेंडा जाळला! VIDEO

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 25, 2022 04:18 PM IST

पाकिस्तान झिंदाबाद घोषणेचा निषेध करण्यासाठी पुण्यात आज मनसैनिक रस्त्यावर उतरले. यावेळी वंदे मातरम..पाकिस्तान मुर्दाबाद, पीएफआय मुर्दाबाद… अशी घोषणाबाजी करण्यात आली. तसेच काहींनी पाकिस्तानच्या झेंड्याचे पोस्टर जाळून संताप व्यक्त केला.

पुण्यात मनसेकार्यकर्ते आक्रमक
पुण्यात मनसेकार्यकर्ते आक्रमक

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेच्या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी आंदोलन केले होते. यावेळी'पाकिस्तान झिंदाबाद' घोषणा दिल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले.'पाकिस्तान झिंदाबाद' अशा घोषणा दिल्या का, याचा तपास करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र याचे पडसाद राज्यभरात उमटायला सुरूवात झाली आहे. पाकिस्तान झिंदाबाद घोषणेचा निषेध करण्यासाठीअनेक ठिकाणी आज मनसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी वंदे मातरम.. पाकिस्तान मुर्दाबाद, पीएफआय मुर्दाबाद… अशी घोषणाबाजी करण्यात आली.

पाकिस्तान झिंदाबाद घोषणेचा निषेध करण्यासाठी पुण्यात आज मनसैनिक रस्त्यावर उतरले. यावेळी वंदे मातरम.. पाकिस्तान मुर्दाबाद, पीएफआय मुर्दाबाद… अशी घोषणाबाजी करण्यात आली. तसेच काहींनी पाकिस्तानच्या झेंड्याचे पोस्टर जाळून संताप व्यक्त केला.

या प्रकरणानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी इशारा दिला आहे. एनआयएने छापे घातले आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली, म्हणून पुण्यात ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा दिल्या. सरकारने त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिली आहे. तसेच PFI च्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल, तर तुमचा धर्म घ्या, आणि पाकिस्तानात चालते व्हा. असली थेरं आमच्या देशात चालणार नाहीत, असा इशारा देखील राज ठाकरेंनी दिला आहे.

तत्पूर्वी, माझी केंद्रातील आणि राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की फक्त ह्या देशद्रोह्यांनाच नव्हे तर त्यांच्या ह्या समर्थकांना पण अशी अद्दल घडवा की, यापुढे पाण्यासाठी देखील ( पा ) उच्चारता येणार नाही, नाहीतर आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. हिंदुस्थानातील हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील हिंदू मरहट्ट्यांच्या मुठी जर आवळल्या तर ह्या हरामखोरांना कुठे पाय लावून पळायला लागेल हे मला सांगायला लावू नका. ह्या सगळ्याने उगाचच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित असल्याचं राज ठाकरेंनी पोस्टद्वारे म्हटलं आहे. असे पत्र त्यांनी अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या