वर्धा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने कॉलेजच्या छतावरून उडी मारून आपलं जीवन संपवलं आहे. विद्यार्थिनीने कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयात घडली. पूजा रजानीअसं आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
पूजा एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला शिकत होती. वैद्यकीय कारणामुळे ती कॉलेजमध्ये सतत गैरहजर असायची. हजेरी न भरल्यामुळे कॉलेज प्रशासनाने तिला परीक्षा देण्यापासून रोखले होते. यामुळे ती तणावात होती,अशी माहिती तिच्या सोबतच्या विद्यार्थ्यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,आज सकाळीच आपली आपल्यावर लादलेली परीक्षेवरील बंदी हटावी म्हणून हॉस्टेलच्या सहकाऱ्यांसोबत वरिष्ठांकडे गेली होती. त्यानंतर काही वेळानंतरच तिने कॉलेजच्या छतावरून जाऊन खाली उडी मारली व आपलं जीवन संपवलं. विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर विद्यार्थ्यांमध्ये कॉलेज प्रशासनाविरोधात संतापाचे वातावरण असून घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सावंगी पोलीस या यापाराकरणी अधिक तपास करत आहेत.
या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक नुरूल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक व सावंगी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या घटनेवर वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मागील काही दिवसांपासून तरुणी तणावात होती,त्यातून तिने टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता वर्तवली आहे. या विद्यार्थिनीला परीक्षेत न बसाविण्याचा घेतलेला महाविद्यालयाचा निर्णय कोणताही वेगळा किंवा अनपेक्षित नाही. युजीसीने कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी हा ७५ टक्के थेरीत आणि ८० टक्के प्रॅक्टिकलमध्ये उपस्थित असणे अनिवार्य केले आहे. तरुणीला परीक्षेला न बसण्याची परवानगी युजीसीच्या नियमानुसारच आहे. विद्यार्थिनीच्या आत्महत्येबाबत वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने तातडीने माजी कुलगुरु राजीव बोरले यांच्या नेतृत्वात उच्च स्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. ही समिती या प्रकरणाचा तपास करणार आहे.
गायत्री दाभाडे ही शहरातील एका विद्यालयात दुसऱ्या वर्षात बीएचएमएसचे शिक्षण घेत होती. ती हॉस्टेलला राहत होती. गायत्रीवर दत्तू गायके याचे एकतर्फी प्रेम होते. तो तिचा पाठलाग करत होता. तसेच तिला फोन करून रस्त्यात अडवून त्रास देत होता. ऐवढेच नाही तर माझ्यासोबत मैत्री कर, मला भेटायला ये अशी जबरदस्ती दत्तू गायत्रीला करत होता. माझ्यावर प्रेम केलं नाही तर मी आत्महत्या करेल, अशी धमकीही दत्तूने गायत्रीला दिली होती. तिला तो नेहमी त्रास देत असे. गायत्रीने वर्षभर हा त्रास सहन केल्यावर घाबरलेल्या गायत्री दाभाडेने हॉस्टेलमध्ये गळाफास घेऊन आत्महत्या केली.
संबंधित बातम्या