Manoj Jarange : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत मोर्चा काढणार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Manoj Jarange : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत मोर्चा काढणार

Manoj Jarange : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत मोर्चा काढणार

Jan 30, 2025 06:00 PM IST

Manoj Jarange Hunger Strike Updates: मराठा नेते मनोज जरांगे यांनी आज अखेर उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली.

मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित
मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित

Manoj Jarange News: मराठा आरक्षणाबाबतच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले मराठा नेते मनोज जरांगे यांनी आज अखेर उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. पण ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. तसेच आमच्या मागण्या मान्य झाल्यास झाल्यास मुंबईत मोर्चा काढणार, असाही इशारा जरांगे यांनी यावेळी दिला. जरांगे यांचे वर्षभरातील हे सातवे आंदोलन आहे.

मनोज जरांगे यांच्याव्यतिरिक्त, महिलांसह १०४ कार्यकर्त्यांनी २५ जानेवारीपासून मराठा समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गांतर्गत आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषण सुरू केले. उपोषणदरम्यान, त्यांची प्रकृती बिघडल्याने भाजप आमदार सुरेश धस यांनी राज्य सरकारच्यावतीने अंतरवली सराटीत जरांगे यांची भेट घेतली. राज्य सरकारकडून मनोज जरांगे यांना काही आश्वासने देण्यात आली. त्या आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली.

राज्य सरकारकडून मनोज जरांगेला अश्वासन

  • कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर स्थापन झालेल्या कक्षामार्फत कार्यवाही करणार.
  • हैदराबाद गॅझेट तपासून शिंदे समितीकडून अहवाल घेऊन उचित कारवाई करण्यात येईल.
  • निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वातील समितीला एक वर्षाची मुदतवाढ देण्याची कार्यवाही सुरु केली.
  • मराठा आंदोलकांवरील गुन्हे उच्च न्यायाच्या निर्देशानुसार आणि शासन निर्णयानुसार तपासून मागे घेणार.
  • मराठा आंदोलकांवरील गंभीर स्वरुपाचे गुन्हे वगळता गुन्हे तपासून मागे घेणार.

मुख्यमंत्र्यांना शांत बसू देणार नाही

मनोज जरांगे म्हणाले की, मी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. कारण, मी पुढे जाण्यासाठी वेगळी रणनीती अवलंबण्याचा निर्णय घेतला. सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा त्यांचा हेतू आहे का? हे स्पष्ट करावे. मी फडणवीस यांना बुधवारी संध्याकाळपर्यंत त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले, पण ते गप्प राहिले. या मुद्द्याला कोण खरोखर समर्थन देते आणि कोण नाही, हे उघड करण्यासाठी माझे उपोषण होते. मी मुख्यमंत्र्यांना शांत बसू देणार नाही. मराठा समाजाला आता कळले आहे की, चूक कोणाची आहे. सत्तेत आल्यानंतर फडणवीस यांनी मराठ्यांचा विश्वासघात केला आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर मौन बाळगले, पण मी त्यांना सोडणार नाही.

संतोष देशमुख हत्येतील सहभागींना फाशी द्या

मनोज जरांगे यांनी बीड जिल्ह्यातील मसाजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील सहभागींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. दरम्यान, ९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण, छळ आणि हत्या करण्यात आली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर