"यांना कशात खावं हे सुद्धा कळत नाही; कोणालाच सोडू नका,सर्वांना जेलमध्ये टाका"; जरांगेंची संतप्त प्रतिक्रिया
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  "यांना कशात खावं हे सुद्धा कळत नाही; कोणालाच सोडू नका,सर्वांना जेलमध्ये टाका"; जरांगेंची संतप्त प्रतिक्रिया

"यांना कशात खावं हे सुद्धा कळत नाही; कोणालाच सोडू नका,सर्वांना जेलमध्ये टाका"; जरांगेंची संतप्त प्रतिक्रिया

Updated Aug 26, 2024 08:50 PM IST

Manojjarange On Shivaji maharaj statue : यांना दैवत कळत नाही. यांना कशात खावं कळत नाही. कुणालाही सोडू नका, सर्वांना जेलमध्ये टाका अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली आहे.

मनोज जरांगेंची संतप्त प्रतिक्रिया
मनोज जरांगेंची संतप्त प्रतिक्रिया

मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा ३५ फुटी भव्य पुतळा कोसळला आहे. यावरून शिवप्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर आता मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. यांना दैवत कळत नाही. यांना कशात खावं कळत नाही. कुणालाही सोडू नका, सर्वांना जेलमध्ये टाका अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली आहे.

पुतळा उभारला की,  प्रशासन मोकळं होतं मात्र त्याची देखरेख करणं गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणी असंच आहे. निवडणुका झाल्यानंतर छत्रपती शिवरायांचे सरकार येण्यासाठी आशीर्वाद घेतलेला आहे. आता नुसते उद्घाटन उद्घाटन निवडणुका निवडणुका सुरू आहे. दैवताचे अपमान करू नका. छत्रपती शिवरायांचे अरबी समुद्रातील स्मारक, इंदू मिलचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासंदर्भात फक्त निवडणुका आल्यावर बोलायचं, हे बंद करा आता, असे खडेबोल जरांगे यांनी राजकारण्यांना सुनावले.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम करणारा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? कोणीतरी नेताच असणार, यांना कशातही पैसै खायची सवय लागली आहे. सर्वांना जेलमध्ये टाकलं पाहिजे.

हे लोक चांगलं काम करत नाहीत. यांना पुतळे कळत नाही, दैवत कळत नाही, छत्रपती शिवराय देशाचे दैवत, ते हिंदू धर्माची अस्मिता आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवरायांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे भूमिपूजन केल होतं, हे विसरू नका, ध्यानात ठेवा, असा टोलाही त्यांनी लगावला.

मालवणमधील पुतळ्याचा ठेकेदार कोण.. उद्घाटन कोणी केलं, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करतात. यांना कशात खाव हे सुद्धा कळत नाही. मोदींवर आरोप करणाऱ्यांना जरांगे पाटील यांनी सुनावत म्हटले की, पुतळ्याचे मोदींनी उद्घाटन केले म्हणतात. त्यांना दोष देऊन उपयोग नाही. त्यांचा काय दोष आहे, काम करणारेच नाट नसले तर उद्घाटक काय करणार असले लोक ज्यांना छत्रपती शिवरायांचा पुतळा कळत नाही त्यांना सोडू नये. अशांना अद्दल घडली पाहिजे.

 

संभाजीराजेही आक्रमक -

संभाजीराजेंनी म्हटले की, पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला ! मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला व घाईगडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही. अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यांवर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार! आता त्याठिकाणी पुन:श्च महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचेच आहे. पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या इर्ष्येत परत काही गडबड करू नये. उशीर होऊ दे पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या