मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Manipur Gang Rape : मणिपूर बलात्कार प्रकरणाचे महाराष्ट्रात पडसाद; पुण्यासह वर्धा, औरंगाबादमध्ये घटनेचा निषेध

Manipur Gang Rape : मणिपूर बलात्कार प्रकरणाचे महाराष्ट्रात पडसाद; पुण्यासह वर्धा, औरंगाबादमध्ये घटनेचा निषेध

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jul 24, 2023 12:13 PM IST

Manipur Gang Rape Case : मणिपुरमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा राज्यातील अनेक शहरांमध्ये निषेध करण्यात आला आहे.

Manipur Violence News Updates
Manipur Violence News Updates (PTI)

Manipur Violence News Updates : मणिपुरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचात तीन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विरोधी पक्षांनी मणिपुरमधील संतापजनक घटनेचा निषेध केला आहे. त्यानंतर आता या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मणिपुरमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटल्याचं दिसून येत आहे. पुणे, वर्धा, नागपूर, मुंबई आणि औरंगाबाद या शहरातील नागरिकांनी रस्त्यावर उतरून मणिपुरमधील घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. यावेळी नागरिकांनी मणिपूर सरकार आणि मोदी सरकारच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मणिपूर येथील बलात्कार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी युवक क्रांती दलाकडून पुणे तसेच औरंगाबादमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी दोन्ही शहरातील नागरिक मोठ्या संख्येने मोर्चा सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी अनेक नागरिकांनी या घटनेविषयी संताप व्यक्त करत केंद्र तसेच मणिपूर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलनात अनेक सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या. याशिवाय वर्धा, नागपूर आणि मुंबईतील अनेक ठिकाणी नागरिकांनी मणिपूर येथील घटनेचा निषेध करण्यासाठी मूक मोर्चा काढला. देशात लोकशाहीला कलंक लावणारी घटना घडत असताना मोदी सरकार गप्प का?, असा सवाल आंदोलनकर्त्यांकडून उपस्थित करण्यात आला. याशिवाय अनेक आंदोलकांनी मोदी सरकारवर टीका करणारी पोस्टरबाजी देखील केल्याचं पाहायला मिळालं.

नेमकं प्रकरण काय आहे?

गेल्या दोन महिन्यांपासून मणिपुरमध्ये मैतेई आणि कुकी या समुदायांमध्ये हिंसाचार सुरू आहे. ४ मे रोजी ७०० ते ८०० लोकांच्या जमावाने ३ कुकी महिलांना विवस्त्र करत त्यांची धिंड काढली होती. त्यानंतर आरोपींनी या महिलांवर बलात्कार केला होता. घटनेच्या ७८ दिवसांनंतर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर अनेकांनी त्यावरून संताप व्यक्त करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपुरमधील घटनेवर भाष्य केलं आहे. आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असून अशा घटनांमुळं देशाची मान खाली जात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

WhatsApp channel