Maharashtra Weather Update : पुण्यात उष्णतेच्या झळा तर मुंबईत गारठा, राज्यात तापमानात होणार घट, IMD चा इशारा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : पुण्यात उष्णतेच्या झळा तर मुंबईत गारठा, राज्यात तापमानात होणार घट, IMD चा इशारा

Maharashtra Weather Update : पुण्यात उष्णतेच्या झळा तर मुंबईत गारठा, राज्यात तापमानात होणार घट, IMD चा इशारा

Updated Feb 12, 2025 08:55 AM IST

Maharashtra Weather Update : राज्याच्या तापमानात २ ते ३ तीन अंश डिग्री सेल्सिअसने घट होण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे.

पुण्यात उष्णतेच्या झाला तर मुंबईत गारठा, राज्यात तापमानात होणार घट, IMD चा इशारा
पुण्यात उष्णतेच्या झाला तर मुंबईत गारठा, राज्यात तापमानात होणार घट, IMD चा इशारा

Maharashtra IMD Weather Update : राज्यात तापमानात अनेक चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यातून गायब झालेली थंडी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील ५ दिवसांत राज्यातील तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यात सध्या हवामान कोरडे असून पुढील काही दिवसांत तापमानात घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. दारम्य, पुण्यासह मराठवाड्यात उष्णतेच्या झळा कायम आहेत. तर मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. तापमानात घट होऊन थंड वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यात मंगळवारी ३४ डिग्री सेल्सिअस कमाल तर १४ डिग्री सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहणार आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवसांत कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. पुण्यात पुढील पाच दिवस आकाश निरभ्र राहणार आहे. उत्तर भारतातून दक्षिणेच्या दिशेनं येणाऱ्या वाऱ्याच्या मार्गात अडथळे निर्माण झाल्याने मुंबईतील थंडी कमी झाली होती. मात्र, मुंबईत आता पुन्हा हे वारे वाहू लागणार असल्याने मुंबईकरांना गारठा अनुभवता येणार आहे. हे थंड वारे नाशिक, ठाणे, नवी मुंबईसह मुंबईच्या दिशेने वाहणार असून त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी जाणवणार आहे. दरम्यान, मुंबईच्या हवेचा दर्जा देखील सुधारण्यास मदत होणार आहे .

पुण्यात पारा ३४ अंशांवर

पुण्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे. पुण्याचा पारा हा ३४ डिग्री सेल्सिअसवर पोहोचला आहे. तर मध्य महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी तापमान वाढलं आहे. पश्चिम महाराष्ट्र पट्ट्यामध्ये किमान तापमानात वाढ झाली आहे. पुण्यात मंगळवारी किमान तापमान १४ डिग्री सेल्सिअस नोंदवल्या गेले. मुंबईप्रमाणेच निफाडमध्येही पारा ८ अंशांवर गेल्यामुळं हवामानाचा काहीच नेम नाही असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

मुंबईत कमाल तापमान २९.६ तर किमान तापमान हे २१.५ डिग्री सेल्सिअस नोंदवल्या गेले आहे. तर सांताक्रुज येथे कमाल तापमान हे ३२.८ डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान हे १८.८ डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. तर अलिबाग येथे २९.७ डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आल आहे आहे.

पुढील दोन दिवस उत्तर-मध्य महाराष्ट्र व पुण्यात किमान तापमानात काही अंशांनी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिमी झंझावात ओसरल्यानंतर उत्तरेकडील वारे उत्तर-मध्य महाराष्ट्रात, विदर्भासह उर्वरित क्षेत्रात सक्रिय होणार असल्याने सकाळी व संध्याकाळच्या तापमानात मोठी घट होणार असल्याची शक्यता आहे.

Ninad Vijayrao Deshmukh

TwittereMail

निनाद देशमुख हिंदुस्तान टाइम्स-मराठीमध्ये सीनिअर कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून २०२२ पासून कार्यरत आहे. निनादने पुणे विद्यापीठातून एमए (जर्नलिझम) शिक्षण घेतले आहे. पुण्यातील केसरी वृत्तपत्रातून २००७ मध्ये बातमीदार म्हणून करियरची सुरूवात. २००९ ते २०२२ पर्यंत लोकमत, पुणे येथे वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केले. निनादला डिफेन्स, सायन्स, अंतराळ विज्ञान, आंतरराष्ट्रीय राजकारण विषयांची विशेष आवड आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर