Maharashtra Weather Update : राज्यात पुढील तीन दिवस पावसाचे! या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह बरसणार; यलो अलर्ट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : राज्यात पुढील तीन दिवस पावसाचे! या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह बरसणार; यलो अलर्ट

Maharashtra Weather Update : राज्यात पुढील तीन दिवस पावसाचे! या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह बरसणार; यलो अलर्ट

Updated Oct 29, 2024 07:50 AM IST

Maharashtra Weather Update : राज्यात पुढील तीन दिवस पावसाचे असणार आहे. दिवाळी सण पावसात साजरा करावा लागणार आहे. मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात पुढील तीन दिवस पावसाचे! या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह बरसणार; यलो अलर्ट
राज्यात पुढील तीन दिवस पावसाचे! या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह बरसणार; यलो अलर्ट (HT_PRINT)

Maharashtra Weather Update : राज्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह हा पाऊस होणार असल्याने भर पावसात दिवाळी साजरी करण्याची वेळ नागरिकांवर येणार आहे. ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान, राज्याच्या विविध भागात हा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार ३० तारखेला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर शहर व घाट परिसर, सातारा व घाट परिसर, संभाजी नगर, जालना परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

तर ३१ तारखेला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर शहर व घाट परिसर, सातारा व घाट परिसर, सांगली, सोलापूर, संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धारशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

तर १ नोव्हेंबरला, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर शहर व घाट परिसर, सातारा व घाट परिसर, सांगली, सोलापूर, संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासाह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात गेल्या राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुलाबी थंडीची चाहूल लागली होती. हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी झाल्याने व हवामान कोरडे झाल्याने सकाळी आणि रात्री थंडी पडू लागली होती. मात्र, दाना चक्रीवादळाचा तडाखा ओडिशाच्या किनारपट्टीला बसल्यावर हवेतील बाष्प पश्चिमेकडे वळले आहे. त्यामुळे राज्यात ऐन दिवाळीत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुण्यात मध्यरात्री पावसाची हजेरी

पुण्यात मध्य रात्री पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह काही तुरळक ठिकाणी पाऊस पडला, या पावसामुळे वातावरणातील गारठा वाढला. दरम्यान, पुण्याला पुढील दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर