Maharashtra Weather update: राज्यात काही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. आज देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सोमवारी गडचिरोली, चंद्रपूर जिल्हयात मुसळधार पावामुळे पुरस्थिती उद्भवली होती. आज देखील विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांना आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार वायव्य आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या उपसागरावर तीव्र कमी दाबाचा पट्टा उत्तरी वायव्य दिशेने जात आहे. त्यामुळे कोकण आणि गोव्यात पुढील चार ते पाच दिवस बहुतांश ठिकाणी मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गोंदिया येथे पुढील दोन दिवस म्हणजे येत्या ४८ तासात मेघगर्जना व विजांच्या कडकडासहित तुरळक ठिकाणी खूप जोरदार म्हणजे २४ तासात बारा सेंटीमीटर ते वीस सेंटीमीटर इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोंदिया येथे आज व उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. भंडारा आणि नागपूर या दोन जिल्ह्यांसाठी आज दहा तारखेला मेघगर्जना विजांच्या कडकडातहीत तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आहे. रायगड रक्तागिरी व सिंधुदुर्ग येथे पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच २४ तासात ६ सेंटीमीटर ते ११ सेंटीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना पुढील दोन ते तीन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे.
नाशिक, पुणे, कोल्हापूर व सातारा या जिल्ह्यांच्या घाट विभागात पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी मेघ गर्जना व वीजांचा कडकडाटा सहित जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांच्या घाट विभागात यलो अलर्ट दिला आहे. डोळे जळगाव व नंदुरबार येथे पुढील दोन ते तीन दिवस मेघ गर्जना वीजांचा कडकडाटासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. व ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे पाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी व हिंगोली येथील पुढील दोन ते तीन दिवस तर नांदेड व लातूर येथे आज मी गर्जना व विद्यार्थ्यांच्या कडकडासहित तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे . तसेच ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे पाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्यात या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पुढील दोन ते तीन दिवस मेघ गर्जना व वीजांच्या कडकडासहित पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ येथे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भासाठी पुढील दोन ते तीन दिवस हॅलो अलर्ट दिला आहे.
पुणे आणि आसपासच्या परिसर पुढील तीन दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या एक दोन सरी पडण्याची शक्यता आहे. तसेच गहाड विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भात विभागासाठी पुढील तीन दिवस गेलो अलर्ट चांगला आहे.
संबंधित बातम्या